HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिष्टमंडळ रवाना

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सहाजनांचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहे. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्या चर्चेतून काय निर्णय घेण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एल्गार मोर्चा’ काढला आहे.

तसेच एल्गार मोर्चात सहभागी झालेले श्रीमंत कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे. ‘संभाजी भिडे यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा,’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

या मोर्चाला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सीएसटी येथून सुरुवात होईल. सर्व मोर्चेकरी आझाद मैदानात दाखल झाले. हा मोर्चा जिजामाता उद्यान येथून आझाद मैदानपर्यंत रॅली काढण्यात येणार होती. पण, पोलिसांनी रॅलीसाठी परवानगी नाकारल्यामुळे सर्व मोर्चेकरी सीएसटी स्टेशन येथून सरळ आझाद मैदानात मोर्चेसाठी दाखल झाले. त्यानंतर सर्व मोर्चा आझाद मैदानात जमून सरकार विरोधात घोषणा देत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलुंडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग

News Desk

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

News Desk

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

Gauri Tilekar