HW News Marathi
मनोरंजन

गणेशोत्सव २०१८ | लालबागच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली . सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात ‘श्री’ची स्थापना झाली. येथूनच ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.

कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ‘हाय ग्रेड कॅन्सर’

News Desk
महाराष्ट्र

सांगलीत १४ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

News Desk

सांगली | सांगलीच्या ब्रम्हणाळमध्ये शुक्रवारी कृष्णा नदीच्या पात्रात एका मगरीने १४ वर्षाच्या मुलाला पाण्यात ओढल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक मगरीने हल्ला करत मुलाला पाण्यात ओढल्यामुळे परिसरात मगरीची दहशत निर्माण झाली आहे. गरमीचे प्रमाण वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात काही मुले पोहत असताना ही घटना घडली आहे. मगरीने ज्या मुलाला पाण्यात ओढले तो मुलगा बेळगावरुन आपल्या मामाच्या गावी आला होता. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला परंतु अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. रात्री साडेआठपर्यंत वनविभागच्या पथकाकडून मुलाचा शोध सुरु ठेवण्यात आला होता. रात्री उशीरा ही शोधमोहीम वनविभाकडून थांबविण्यात आली होती परंतु स्थानिकांनी मात्र अजूनही मुलाचा शोध सुरु ठेवला आहे. स्थानिकांनी या मुलाला मगरीने पाण्यात ओढताना पाहीले असल्यामुळे त्याचा शोध घेणे प्रशासनासाठी अधिकच आव्हानात्मक झाले आहे.

Related posts

पंडित नेहरूंवर टीका करणे राज्यपालांना शोभत नाही, नाना पटोलेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल!

News Desk

सोलापुरातील जि. प. शाळांच्या १६४ इमारती धोकादायक

News Desk

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk