HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापुरातील जि. प. शाळांच्या १६४ इमारती धोकादायक

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांच्या ग्रामीणभागातील १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे आहे. त्यामुळ या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जीव मुठीत धरून त्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यापैकी ८१इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचीमासिक बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात या विषयावर चर्चा झाली.

जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक असलेल्या इमारती निर्लेखित करून पाडण्यासाठी दरवर्षी आढावा घेतला जातो. अशा१६४ इमारतींची माहिती यावर्षी मिळाली आहे. या सर्व शाळांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून तत्काळ पाठविण्यात यावे, अशा सूचनाया बैठकीत देण्यात आल्या.

या महिन्यामध्ये जिल्ह्यात ज्ञानरचनावाद कार्यक्रम राबविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून सहा लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारीकार्यालयाकडू ५५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २८२३० रोपे लावण्यात आली़ ही सर्व रोपे जगविण्यासाठी आणि त्याचा आढावाघेण्यासाठी वेबसाईट तयार केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही !

News Desk

भास्कर जाधवांच्या विडिओ वर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया !

News Desk

सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी!, सेनेचा सूचक इशारा

News Desk