HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही !

उस्मानाबाद | ‘शरद पवार जो सन्मान दिला तितका सन्मान त्यांना ( सोडून गेले त्यांना ) भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही’, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल (१७ सप्टेंबर) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवारांनी कार्यकर्ता मेळाव्यालाही संबोधित केले.

पक्षा सोडून जाणाऱ्यावर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की, ‘राजकारणाची समज नसताना ज्यांनी राज्यमंत्रीपद दिले, प्रतिष्ठा दिली, एवढे सगळे वैभव अनुभवण्याची संधी दिली त्याच व्यक्तीला काही जण सोडून गेले. अशा गद्दारांना उस्मानाबदची जनता याच मातीत यांना गाडल्याशिवाय राहणार नाही’. तसेच मुंडे भाषणादरम्यान म्हणाले की, ‘राजे गेले, सरदार गेले, सेनापती गेले अभिमान वाटतोय माझ्या या राष्ट्रवादीच्या सच्चा मावळ्यांचा जे आजही पवारांच्या पाठिशी खंबीपणे उभे आहेत. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तो पर्यंत पवारांचा पुरोगामी विचार या मातीत रूजवल्याशिवाय स्थिर राहणार नाही.

भाजपमध्ये निर्माण झाले दोन गट

भाजपच्या मेगाभरतीवर टीका करताना मुंडे म्हणाले की, ‘आता भाजपमध्ये सुद्धा विभाजन झाले. भाजप ओरिजनल, आणि भाजप नवभरती असे दोन गट तयार झाले आहे. भाजपच्या अध्यक्षांची आमच्या मातीत येऊन, पवार यांच्याविषयी बोलण्याची हिंमत कशी होते. पवारांनी महाराष्ट्रात जितकी विमानतळे बांधली तितकी बस स्थानके सुद्धा गुजरातमध्ये बांधली नसतील,’ अशी टीका त्यांनी शहांवर यांच्यावर केले.

छत्रपतींच्या घराण्यात फुट

२१व्या शतकातील छत्रपतींचा इतिहास काय असेल तर आपले दैवत शिवाजी महाराज यांच्या घराण्यात फुट पाडणाऱ्या अनाजी पंतांचे नेतृत्व छत्रपतींच्या वारसांनी स्विकारले. ज्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा सळसळता स्वाभिमान आहे त्यांचा हा घोर अपमान आहे, अशी खंत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

News Desk

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा १२५-१२५चा फॉर्म्युला

News Desk

मावळणाऱ्यांची चिंता करू नका, उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या !

News Desk