HW News Marathi
महाराष्ट्र

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका”, नितेश राणेंनी डिवचले

मुंबई | महाविकासआघाडी सरकारमधील अनेक नेते अडचणीत सापडत आहेत. तसेच, या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर विरोधकांनी अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट कोकणी भाषेत अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिवहन खात्यात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली.

काय म्हणाले नितेश राणे?

सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनिल परब गोत्यात आले. आमदार नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, ओ परबांनू, मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका. उगाच उद्या इज्जत जावुक नको. आजच उरलीसुरली लाज वाचवा आयकतास ना” असा टोला अनिल परब यांना लगावला आहे.

 

काय आहे प्रकरण?

राज्याच्या आरटीओ विभागात गेल्या २ वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नाशिक पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले. यानुसार गेल्या तीन दिवसांपासून विविध शासकीय अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. सोमवारी (दि.३१) तक्रारदार निलंबित मोटार निरिक्षक गजेंद्र तानाजी पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. संपुर्ण दिवसभर आयुक्तालयाच्या वास्तुमधील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरु होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या? – सचिन सावंत

News Desk

अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय? SCO बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट!

News Desk

दोन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता…

News Desk