HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १२वीची परीक्षा रद्द, राज्य सरकारचा प्रस्ताव झाला मंजूर

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र, १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, १२ वीची परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती.

आज (३ जून) अखेर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. १२ वीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत १२वी परीक्षा रद्द करण्यावर चर्चा झाली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाला राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला होता. आजच्या बैठकीत तो मान्य झाला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या (२ जून) बैठकीनंतर शालेय शिक्षममंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी असं सांगितलं की, शिक्षण खात्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवणार होते. या प्रस्तावावर चर्चा करुन मगच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण परिस्थीतीची माहीती बैठकीत दिली असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

तर दुसरीकडे कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांनी काल राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhima Koregaon : गौतम नवलखा, डॉ. आनंद तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

News Desk

मराठा आरक्षणावरील स्थगिती तुर्तास हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

News Desk

“…त्या लहान मुलाचा काय दोष”, मुंबईच्या महापौरांचा मालाड दुर्घटनेवर  प्रश्न

News Desk