HW News Marathi
महाराष्ट्र

कुत्र्यांच्या हल्ल्यातील मृत बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाखांची भरपाई

सांगली – मिरजेतील कत्तलखाना परिसरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून दोन वर्षांच्या बालिकेचे लचके तोडले होते. या हल्ल्यात ठार झालेल्या चिन्मयी उमेश कारंडे या बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने नगरविकास सचिवांना दिले आहेत. मात्र नगरविकास विभागाने अद्याप ही भरपाई दिली नसल्याने, नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मानवाधिकारकार्यकर्त्यांनी रविवारी सांगितले.

बेडग रस्त्यावर सांगली-मिरज महापालिकेच्या कत्तलखान्याजवळ मोकाट कुत्र्यांचा वावर कायमच आहे. ३० एप्रिल २०१० रोजी चिन्मयी कारंडे या बालिकेवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाला होता. चिन्मयीच्या मृत्यूबाबत हराळे, कांबळे व दीपक ढवळे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सांगली-मिरज महापालिका व पोलिस प्रशासनाविरुद्ध राज्य मानवी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सुनावणीनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने १० एप्रिल २०१७ रोजी नगरविकास मंत्रालयास, मृत चिन्मयीच्या कुटुंबियांना १५ लाख रुपये नुकसान भरपाई तीन महिन्यांत देण्याचे आदेश दिले. तीन महिन्यांत भरपाई न दिल्यास साडेबारा टक्के व्याजासह भरपाईचे आदेश आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत खंबीर, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

News Desk

Amol Bhosale Exclusive : कमल ३७० आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही हे म्हणणे चुकीचे !

News Desk