HW News Marathi
महाराष्ट्र

कवयित्री ज्योती कदम यांना ” आम्ही जिजाऊंच्या वारसदार ” राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

उत्तम बाबळे

नांदेड – सुप्रसिध्द कवयित्री व साहित्यिक ज्योती कदम यांना पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ” आम्ही जिजाऊंच्या वारसदार ” हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी नुकताच जाहीर झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात १८ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

पुणे येथील काव्यमित्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे सतरावे वर्ष आहे. राहूरी कृषीविद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.पी.ए. तुरबतमठ,राष्ट्रीय आयुर्वेद विश्वपरिषद (भारत सरकार) चे अध्यक्ष डॉ. राजाराम त्रिपाठी यांच्यासह अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे.

ज्योती कदम यांची मोरपीस आणि गारगोट्या,चित्रकाव्य आदी चार पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांवरून काव्यवाचन केले आहे तसेच व्याख्याने दिली आहेत. नामवंत व नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकावरील त्यांचे समीक्षण आदी लेखन अनेक दैनिकांमधून प्रकाशीत झाले आहे. त्यांच्या कवितेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला असून विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केले आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या कवि आणि कविता या सदराचे त्या दीड वर्षापासून संयोजन करीत असून त्यात समाविष्ट नामवंत व निवडक कविंच्या कवितांचा त्यांनी संपादीत केलेला काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

यापूर्वी त्यांना दै. लोकमत सखी सन्मान पुरस्कार, कुसुमताई चव्हाण महिला भूषण विशेष सन्मान पुरस्कार, पंढरी युवा गौरव साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार, शिवांजली युवा साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. ज्योती कदम यांना “आम्ही जिजाऊंच्या वारसदार ” हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपशी युती बाळासाहेबांनी जपली, उद्धव ठाकरें तेव्हा कॅमेरा घेऊन फिरत होते, निलेश राणेंचा पलटवार

News Desk

‘मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी “ही” कोणाची जबाबदारी ?’

News Desk

सावित्रीच्या लेकी रोज बळी पडतायेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद – चित्रा वाघ

News Desk