HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ विधानावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण….!

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर कार्यक्रमामध्ये वादग्रस्त पद्धतीने उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर शिवसेनेकडून परखड शब्दांमध्ये टीका करण्यात आली. यानंतर आता खुद्द दत्तात्रय भरणे यांनी त्यावर खुलासा केला असून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. सोलापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दत्ता भरणे यांनी स्टेजवरच सोलापूर महानगर पालिकेच्या महापौरांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त पद्धतीने उल्लेख केला होता. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी खुलासा केला आहे.

दत्तात्रय भरणे यांनी हे विधान केल्यानंतर त्यावर शिवसेनेकडून टीका

सोलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात आले होते. यावेळी स्टेजवर बोलताना बोलण्याच्या ओघात दत्तात्रय भरणे मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त पद्धतीने बोलून गेले. यावेळी स्टेजवर सोलापूरच्या महापौर देखील उपस्थित होत्या. सोलापूरमधील एका उद्यानाच्या कामासंदर्भात बोलताना दत्तात्रय भरणे यांनी हे विधान केल्यानंतर त्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली. त्यानंतर दत्ता भरणे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं.

मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरू द्या

सोलापूरच्या महापौर स्टेजवर आल्यानंतर दत्ता भरणे म्हणाले, “महापौर ताई, नगरसेवकांनी, आयुक्तांनी मला परवानगी दिली. इथे आपल्याला चांगलं गार्डन करायचं आहे. आपल्याला एक कोटी रुपयांचा निधी द्यायचा आहे. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला?”, असं त्यांनी विचारल्यानंतर महापौर म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांना निधी मागायचा आहे अजून”. महापौरांनी असं म्हणताच दत्तात्रय भरणे म्हणाले, “ते मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरू द्या, आपलं आपण करू. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण सुरुवात करू की इथून. जिल्हाधिकारी आहेत, तुम्ही आहात, आयुक्त आहेत. त्यामुळे सुरुवातीला एक कोटीचा चांगला प्रस्ताव द्या, आपण चांगला कार्यक्रम घेऊयात”, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी दत्ता भरणे यांच्यावर टीका केली

दरम्यान, दत्तात्रय भरणे यांच्या विधानानंतर सोलापूरमधील शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी दत्ता भरणे यांच्यावर टीका केली आहे. “भरणेमामा, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक. त्यांच्या जिवावर तुम्ही सत्तेमध्ये बसले आहात. तुम्हाला जनतेनं फेकून दिलं होतं. उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे तुम्ही आज सत्तेत बसला आहात. सरळ मरू द्या मुख्यमंत्री अशी भाषा तुम्ही वापरता. तुम्ही आपल्या औकातीत राहून शब्द वापरा”, असं तानाजी सावंत यांनी दत्ता भरणे यांना सुनावलं.

दत्तात्रय भरणे यांची सारवासारव

आपल्या विधानावरून वाद निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “महापौर शेवटी आल्या. त्यांना मी सांगितलं की आमचं ठरलंय की या गार्डनसाठी आपल्याला डीपीटीसीच्या माध्यमातून पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही तसा प्रस्ताव पाठवा. त्यावर महापौरांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांकडून निधी घेऊ. मी त्यांना एवढंच सांगितलं की मुख्यमंत्र्यांचं आपण नंतर बघू. पण तुम्ही डीपीटीसीच्या माध्यमातून एक प्रस्ताव द्या, आपण त्यांना ताबडतोब एक कोटी देऊ. खरंतर माझ्या वक्तव्याचा काही माध्यमांतून विपर्यास केला गेला”, असा खुलासा दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा

Aprna

“आज बाळासाहबे असते तर म्हणाले असते…..”

News Desk

वाढते असहिष्णूतेचे वातावरण मागच्या दाराने येवू घातलेली आणीबाणी नाही का ? – अजित पवार

News Desk