HW News Marathi
महाराष्ट्र

दानवेंच्या दावणीला महावितरण, साडेसात वर्षांपासून वीज बिल भरलेच नाही

जालनाः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. फटकळ बोलून त्यांनी पक्षाला अनेकदा अडचणीत आणले आहेत. आता ते स्वतः एका प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. त्यांनी गेल्या साडेसात वर्षांपासून महावितरण कंपनीचे तब्बल अडीच लाखांची वीज बिल थकवले आहे. दानवेच्या भोकरदन येथील घराचे हे बिल आहे. सर्वसामान्य ग्राहकांचे दोन महिन्यांचे बिल थकल्यास त्यांचे कनेक्शन तोडले जाते. परंतु दानवेंच्या बाबतीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. दानवेंच्या दबावामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यास अधिकारी धजावत नसल्याचेही बोलले जात आहे, रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी शेतकऱ्यांविरोधात बेताल वक्तव्य करून वाढ ओढावून घेतला होता. त्यानंतर त्यांना माध्यमांशी किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना जीभ सांभळण्याचा सल्ला पक्षातील दिग्गजांनी दिला होता. त्यामुळे दानवे गेल्या काही दिवसांपासून शांत होते. आता तर त्यांचे पद जाणार असल्याच्याही वावड्या उठल्या आहेत. त्यात वीज बिल थकवल्याचे प्रकरण बाहेर आल्याने दानवेंवर पुन्हा टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

EWS मध्ये मराठ्यांना आरक्षण देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे संभाजीराजेंना आश्वासन

News Desk

बुरमराहच्या ‘नो बॉल’वर जयपूर पोलिसांची फ्री हिट

News Desk

राजुभाऊ कोंगे याचा उपोषणाचा इशारा

News Desk
मुंबई

दहीहंडीला मूक दिन पाळण्याचा निर्णय

News Desk

मुंबईः यंदा १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि दहीकाला एकाच दिवशी असले, तरी याच दिवशी राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशन या संघटनेने (पाला) राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात स्वातंत्र्य दिन व दहीहंडी उत्सवादिवशी लाउडस्पीकर व लायटिंग बंद ठेवणार असल्याचे पालाने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. लाऊडस्पीकरच्या उद्योगावर भवितव्य अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आहेत. मात्र, राज्यातील लाऊडस्पीकरच्या बंदीमुळे प्रकाश, ध्वनीशी संबधित असलेला हा उद्योग अडचणीत सापडला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ७५ डेसिबलचे बंधन पाळावे लागते. मात्र वाहतुकीच्या आवाजांसह वातावरणातील ध्वनीची पातळी वाढत आहे, त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी ‘पाला’ संघटनेने केली आहे.

Related posts

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

News Desk

नेतन्याहून भेटले बॉलिवूड तारकांना, म्हणाले जय महाराष्ट्र

swarit