HW News Marathi
महाराष्ट्र

राजुभाऊ कोंगे याचा उपोषणाचा इशारा

विनोद तायडे

वाशिम -वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने वर्ग खोल्या बांधकामाच्या नावाखाली 9 लाख 50 हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याने शाळा चक्क मंदिरात भरविल्या जात असल्याचा आरोप येथील राजूभाऊ कोंगे यांनी केला आहे।. अशा भ्रस्ट दोषी मुख्याध्याकावर कार्यवाही न झाल्यास 11 एप्रिल क्राती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा राजभाऊू कोंगे यांनी जिल्ह्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे .वाशिम तालुक्यातील तोंडगाव राजकारणी गाव समजल्या जाते .वाशिम जिल्ह्यात येथील राजकारणी पुढाऱयांचे मोठे प्रस्थ आहे .पण 1 वर्षाआधी येथील जिल्ह्या परिषद मुख्याध्यापकाने शाळा खोल्याच्या नावाखाली शाळा इमारत पाडून 9 लाख 50 लाख रुपये ओम फॅट स्वहा केले असताना येथील राजकारणी पुढारी मूग गिळून का बसले आहेत की पुढाऱयांचीच मिलीभगत आहे असा प्रश्न गावकर्याना पडला आहे .विध्यार्थ्याना बेवारस करणाऱ्या मुख्याध्यापकावर वरीस्ट अधिकारी यांनी तक्रार प्राप्त होऊनही कार्यवाही का केली नाही जिल्हा परिषद प्रशासन एका मुख्याध्यापकांच्या दावणीला बांधलेले आहे का असा सवालही गावकार्यानी उपस्थित केला आहे .तोंडगाव सारख्या राजकीय प्रस्थ असणार्या गावात लहान मुलांवर मंदिरात आसरा घेण्याची वेळ आली असल्याने डिंग्या मारणाऱ्या राजकीय नेत्यांचा बुरखा फाटला आहे . शाळा इमारत पाडल्यापासून विध्यार्थी हनुमान मंदिरात शिक्षण घेत आहेत .दुसर्या मजल्यावरील व्हरांडयात विध्यार्थ्याना बसविले जात असल्याने 2 महिन्या आधी वर्ग चवथी चा विध्यार्थी अविनाश सुरेश गोटे खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात त्वरित उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले मात्र त्याचे दोन महिन्यांपासून शैक्षणिक नुकसान होत आहे .येथील सामाजीक कार्यकर्ते राजूभाऊ कोंगे याना अशा भ्रस्ट मुख्याध्यापकांची चीड आली त्यांनी गैरव्यवहार करणाऱ्या मुख्याध्यापची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दि 1फेब्रुवारी ला दिलेल्या निवेदनातून केली. मुख्यकार्यकारी अधिकारी राजकीय दबावाला बळी पडत त्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखविली .सदर प्रकरणात जिल्हा प्रशासन व राजकीय नेत्यांची साखळी असल्याचा आरोप कोंगे यांनी केला आहे .राजूभाऊ कोंगे यांनी जिल्ह्याधिकारी यांना न्याय मागितला आहे न्याय मिळण्यासाठी त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी मुख्याध्यापकाच्या गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणी साठी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर 11 एप्रिल क्रान्ती दिनापासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे . जिल्हा प्रशासन त्यांना न्याय देईल का हे एक कोडेच आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझा वाढदिवस साजरा करू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

News Desk

फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध लावतात, नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका!

News Desk

”महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करुन देईल”, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर उदय सामंतांची टीका!

News Desk