HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड महानगरपालिकेत दोन नगरसेवकांत तुंबळ हाणामारी

उत्तम बाबळे

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सभागृहात शनिवारी (दि.1) भाजप व संविधान पक्षाच्या नगरसेवकांमध्ये पाणी प्रश्नावरुन सभागृहात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारामुळे पालिका सभागृहाचे रुपांतर कुस्तीच्या आखाड्यात झाल्याचे चित्र होते.

शनिवारी नांदेड महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे नगरसेवक अभिषेक चौबे यांनी शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याचा मुद्दा सभागृहात मांडला. मात्र, अर्थसंकल्पीय सभेत इतर मुद्दे मांडून व्यत्यय आणू नये, असे सांगत संविधान पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी चौबे यांच्या प्रश्नावर आक्षेप घेतला. त्यामुळे चौबे व देशमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाचीला सुरूवात झाली. थोड्याचवेळात याचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेनंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे महापौर शैलजा स्वामी यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. काही वेळानंतर महापौरांनी मध्यस्थी करत सभागृहाचे कामकाज सुरू केले.लोकप्रतिनिधी लोकहिताचे मुद्दे मांडत असले तरी लोकशाहीची चौकट मात्र मोडत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट दिसून आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार, मंत्रिमंडळात घेतला निर्णय

Aprna

भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका महाविकासआघाडी एकत्र लढणार!

News Desk

‘मराठा आरक्षणासाठी उद्या नांदेडमध्ये मूक आंदोलन’, सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार!

News Desk
देश / विदेश

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आजपासून दिल्लीतून सुरुवात झाली आहे. अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला अखेरची लढाई असे संबोधले आहे. स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असे यापूर्वीच्या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. त्यातून केजरीवाल व आप नावाचा पक्ष उदयास आला होता.

यावेळी आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे फलित काय राहणार आहे, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. गेल्या तीन साडेतीनवर्षे अण्णा शांत बसून होते. त्यांनी केंद्राच्या कारभारावर वेळोवेळी टीका केली. परंतु त्याची केंद्राने दखले घेतली नाही. अखेर अण्णांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

शुक्रवारी सकाळी अण्णांनी रामलीला मैदानावर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. रामलीला मैदानावर देशभरातून आंदोलक दाखल होत आहेत.

आंदोलन दडपण्यासाठी सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांना एकप्रकारे सरकार हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Related posts

“…. तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू” – जीएसटी संदर्भात अजित पवारांचा इशारा

News Desk

आता महाराष्ट्रासह भगतसिंह कोश्यारींकडे आणखी एका राज्याची जबाबदारी 

News Desk

इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार

swarit