HW News Marathi
महाराष्ट्र

प्रशासकीय कामकाजात मानवी आस्थेचा चेहरा जपा – जिल्हाधिकारी पाटील  

नागरी सेवा दिन कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले त्यांचे अभिनंदन

उत्तम बाबळे

नांदेड :- प्रशासकीय कामकाजात मानवी आस्थेचा चेहरा जतन करावा, असे आवाहन नांदेड चे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित ” नागरी सेवा दिन ” कार्यक्रम प्रसंगी येथे केले असून नागरी सेवा दिनानिमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना ” उत्कृष्ट जिल्हाधिकारी ” म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना ” उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार प्रदान मुंबई येथे २१ एप्रिल रोजी ” नागरी सेवा दिनानिमित्त ” संपन्न झालेल्या कार्यक्रमात नागरी सेवा व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड चे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, आ. मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय आदी मान्यवर उपस्थितीत होते. तसेच २१ एप्रिल २०१७ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डाॅ.शंकरराव चव्हाण बचत भवन येथे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, कार्यकारी अभियंता श्री. दारमवाड, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, तहसिलदार संतोषी देवकुळे, तहसिलदार ज्योती पवार आदींची प्रमुख उपस्थितीत ” नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्र.जि.अ.संतोष पाटील पुढे म्हणाले की, राज्याच्या, देशाच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. उदारीकरणाच्या धोरणाचा स्विकार केल्यानंतर, अनेक नव संकल्पनाही रुजल्या. त्यामुळे नागरी विकासाच्या अनुषंगाने प्रशासनाचे स्वरुपही बदलले. लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाही बदलली आहे. शिक्षण, आर्थिक कुवत आणि नागरिकांना झालेली अधिकारांची जाणीव यामुळे परस्थिती बदलली आहे. माहितीचा अधिकारी, सेवा हक्क अधिनियम यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजात गुणात्मक बदल झाल्याचेही जाणवते. यापुढे प्रशासनातील विविध घटकांना नागरिकांना सेवा देण्याचे दायित्त्व स्विकारावेच लागेल. त्यासाठी आता सांघिकरित्याही प्रयत्न करावे लागतील. कर्तव्य आणि सचोटीने प्रयत्न केल्या, सेवेचे दायित्त्व पार पाडल्यास कामाचे समाधानही मिळविता येते. त्यामुळे आता यापुढे प्रशासकीय कामकाजातही मानवी आस्थेचा चेहरा जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले.उपजिल्हा निवडणूक अधिकारी पिनाटे यांनी नागरी सेवा दिन संकल्पनेची माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी वेणीकर यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या वाटचालीबाबत आणि वंचितासाठीची अन्नसुरक्षा योजनेबाबत माहिती दिली.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन केले.तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी मानले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती भेट अखेर राहूनच गेली! विक्रम गोखलेंना पंकजा मुंडेंनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

Manasi Devkar

माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?

News Desk

यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी अखेर चौथ्या दिवशी संपली

Aprna