HW News Marathi
महाराष्ट्र

पळसगावात भिषन आग , ३ घरे जळून खाक              

उत्तम बाबळे नांदेड:-पळसगाव ता.उमरी जि.नांदेड आज दुपारी अचानक कांही घरांना आग लागली.या आगीत ३ घरे व किमती कापसासह संसारोपयगी साहित्य जळून खाक झाले आहे.आग वेळीच आटोक्यात आणली गेल्याने सुदैवाने जीवीत हानी टळली आहे. प्राप्त माहिती नूसार आज दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी १:००वाजताच्या दरम्यान माै.पळसगाव ता.उमरी जि.नांदेड येथील एका घराला अचानक आग लागली.गावात धुर पसरल्याचे पाहून लागलेली आगा आटोक्यात आणण्यासाठी गावकरी गोळा झाले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले.याबाबत भोकर नगर परिषद व उमरी नगरपरिषदेच्या अग्नीशामक बंबाना पाचारन करण्यासाठी तात्काळ माहिती दिली.त्यावरुन दोन्ही ठिकानचे अग्नीशामक बंब तात्काळ घटनास्थळी पोहचले.गावकरी व अग्नीशमक बंबांच्या प्रयत्नांनी आग आटाक्यात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.दरम्यानच्या काळात आगीने राैद्र रुप धारण केले होते.म्हणुन यात ३ घरे ,५० क्विंटल कापूस,संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. असे मिळून लाखो रुपयाचे रुपयाचे यात नुकसान झाले आहे.भर दिवसा आग लागल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी वेळीच सर्वप्रकारे मदत मिळाली.म्हणुन सुदैवाने कसलीही जीवीत हानी झाली नाही.घटनास्थळी उमरी तहसिलदार,नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी व पोलिस पोहचले असून कायदेशीर पंचनामा करने सुरु आहे.पंचनाम्या नंतरच नेमके किती कोणाचे नुकसान झाले आहे ? हे कळणार आहे. लाखोचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न!: सचिन सावंत

News Desk

आशिष शेलार यांचा सासरवाडीत विजय तर जयंत पाटलांची सासरवाडीत हार!

News Desk

नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल, पक्षाला बळकटी मिळेल !

News Desk