HW News Marathi
महाराष्ट्र

बारश्याच्या कार्यक्रमात अल्पवयीन मुलाचा बळी

( गौतम वाघ )

अंबरनाथ – शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गायकवाडपाडा परिसरात काल रात्रि एका बारश्याच्या कार्यक्रमा दरम्यान एका तेरा वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तिघांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर परिसर उल्हासनगर महापालिकेत येत असल्याने तिथे आचार संहिता लागू असतांना रात्री दोन वाजे पर्यन्त डीजे चालु असल्याचं सांगितले जाते. पोलिसांनी वेळीच डीजे बंद केला असता तर प्रतिकचा जिव वाचला असता .असं परिसरातील नागरिकांच् म्हणणं आहे.

उल्हासनगर महापालिका अंतर्गत असलेल्या गायकवाड़ परिसरात राहणारे सत्यजित नरेश गायकवाड यांच्या मुलीचा बारश्याचा कार्यक्रम होता. गायकवाड़ परिवार नामचीन असल्याने हा कार्यक्रम भव्य असाच होता. या कार्यक्रमाला सत्यजित गायकवाडचे भाऊ कबीर नरेश गायकवाड़ (माजी नगरसेवक) आदेश अशोक गायकवाड,आशीष अशोक गायकवाड उपस्थित होते.

या कार्यक्रमात डिजे लावण्यात आल्याने जोरदार नाच गाणे सुरु होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेजारीच राहणारे भास्कर विनायक गायकवाड़ यांचा मुलगा प्रतिक भास्कर गायकवाड़ (13) हा गेला होता. मध्यरात्री 2वा. सुमारास कार्यक्रम चालु असतांना ,प्रतिकच्या छातित गोळी घुसली आणि प्रतिक जख्मी अवस्थेत जागीच कोसळला . त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला.कार्यक्रम थांबविण्यात आला आणि जख्मी प्रतिक भास्कर गायकवाड़ याला उपचारा साठी शासकीय मध्यवर्ति रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मावळली . या घटनेने गायकवाडपाडा परिसरात शोककळा पसरली.

शिवाजीनगर पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटना स्थळी पोहचुन घटनेची शाहनिशा केली ,तसेच भास्कर विनायक गायकवाड यांच्या फिर्यादि नुसार भा.द.वि.302,201,34भा.ह.कायदा ,मुं.पो.का.कलम37(1) 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,या प्रकरणी आदेश अशोक गायकवाड़(25),आशीष अशोक गायकवाड़(21) माजी नगरसेवक कबीर नरेश गायकवाड़(30) यांना तपासा साठी ताब्यात घेण्यात आले असून सत्यजित नरेश गायकवाड हे फरार आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे)गुणवंत पाटील करीत आहे.

सदर परिसरात आचार संहिता लागू असतांना मध्यरात्री पर्यन्त डीजे कसा चालु होता.याबाबत पोलिसांचे गस्त पथक काय करत होते.जर पोलिसांनी वेळीच डीजे बंद केला असता तर ही घटना घडली नसती आणि प्रतिकचा बळी गेला नसता अशी हळ हळ व्यक्त केली जात असून पोलिसांच्या हलगर्जिपणा मुळेच प्रतिकचा बळी गेल्याचा आरोप पोलिसांवर केला जात आहे.अधिक तपास पोलिस करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देश पुन्हा एकजुटीने उभा करण्याचे काम करावे लागेल!: बाळासाहेब थोरात

News Desk

जनादेश महायुतीला, त्यामुळे सरकार महायुतीतीचेच येणार !

News Desk

दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? सामनातून अजित पवारांवर टीका

News Desk