HW News Marathi
महाराष्ट्र

जनादेश महायुतीला, त्यामुळे सरकार महायुतीतीचेच येणार !

मुंबई | “जनादेश महायुतीला, त्यामुळे सरकार महायुतीतीचेच येणार,” असा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, ३१ डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष निवड होणार असल्याची माहिती त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (६ नोव्हेंबर) वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या (७ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला जाणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले. पाटील आणि मुनगंटीवार उद्या सकाळी १०.३० वाजता राज्यपालांना भेटणार आहेत.

“कोणताही नवा प्रस्ताव येणार नाही किंवा पाठवणार नाही,” असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. कोणताही नवा प्रस्ताव नाही, जे ठरले तेच द्या. आणि त्याप्रमाणेच करा, अशी मगणी राऊतांनी आज (६ नोव्हेंबर) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदावर सहमती झाली होती, अशी आठवण राऊतांनी भाजपला करून दिली आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट आणणे म्हणजे जनादेशाचा अनादर होईल. राष्ट्रपती राजवट लादणे महाराष्ट्रावर अन्याय, असे विधान देखील राऊतांनी केले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस उलटून ही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समान वाटपावरून भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप म्हणते की, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा करते. राज्यात मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे दलवाई यांनी राऊतांशी भेट घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध, अजित पवार यांची ग्वाही

Aprna

शरद पवारांच्या ‘त्या’ भाष्यावर मी बोलू शकत नाही – संजय राठोड 

News Desk

अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल! – राजेश टोपे

Aprna