HW News Marathi
महाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे भव्य यात्रा महोत्सव

लाखो भक्त झाले डेरे दाखल

विनोद तायडे

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा येथे दि 11 मार्चला कडक पोलीस बंदोबस्तात मोठी होळी पेटविण्यात येऊन यात्रा महोत्सव आणि संदलची जय्यत तयारी सुरु झाली आहे. 17 मार्च ला वाजत गाजत पिंपळगाव सराई येथून उंटावर भव्य संदल सैलानी बाबा दर्ग्यावर नेला जातो .या संदल ला फार महत्व असल्याने सर्व धर्माचे भाविक भक्त देशाच्या काण्याकोपर्यातून होळी पासून येथे डेरे दाखल होत आहेत.सैलानी बाबा दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात बोकड बळी देण्याची प्रथा आहे याठिकाणी अंगातील भुते पळत असल्याचा समाज असल्याने हातापायात बेड्या असलेले हजारो मनोरुग्ण आबाला वृद्ध बालबालिका झुलताना दिसतात. सैलानी बाबा दर्गा राष्टीय एकात्मतेचे प्रतीक आहे सैलानी यात्रा निमित्त विविध जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य महा मंडळाच्या जादा गाड्या सोडण्यात येतात .लाखो भाविक भक्त याठिकाणी एकाच गर्दी करतात येघे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो मात्र याठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छता ठेवण्याचे काम प्रशासन करत नाही

त्यामुळे सैलानी बाबा यात्रा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जितेंद्र आव्हाडांची शरद पवारांवर सिरीज’साहेब माझा विठ्ठल ‘

News Desk

‘मुंबई हिंदुस्तान है’ रितेश देशमुखचं कंगणा राणावतला सणसणीत उत्तर!

News Desk

वीज बिल माफीसाठी उर्जामंत्र्यांना उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची साथ नाही, माजी उर्जामंत्र्यांचा आरोप

News Desk
देश / विदेश

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णन यांच्या अटकेचे सर्वोच न्यायालयाचे आदेश 

News Desk

 

  • भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना

अक्षय कदम/ वृत्तसंस्था

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टाने एक अभूतपूर्व निकाल दिला, कोलकाता उच्च न्यायालयाचे विदयमान न्यायाधीश सी एस कर्णन यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामिनपात्र गुन्हा दाखल केला असून 31 मार्चपूर्वी हजर राहण्याचे आदेश दिले.

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील ही पहिली घटना म्हणावी लागेल जिथे चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य न्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या पीठाने कर्णन यांच्याअनुपस्थितीत विरोधात पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक यांना पत्र पाठवून कर्णन यांना 31 मार्च रोजी सुप्रिम कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सात सदस्यीय पीठाने मुख्य न्यायाधीशांसोबत 15 मिनिटे चर्चा करून पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला. कर्णन यांनी संबंधित न्यायाधीशांबाबत केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. यासंदर्भात कर्णन यांनी फॅक्स केलेले पत्र त्यांची बाजू म्हणून ग्राह्य धरण्यास नकार देण्यात आला असून कर्णन यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, न्यायाधीश कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

पतंजलीवर सरकारची कृपादृष्टी, विरोधक आक्रमक

swarit

‘५४ कारखान्यांचीही चौकशी झाली पाहिजे’, चंद्रकांत पाटील अमित शहांना लिहिणार पत्र

News Desk

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk