HW News Marathi
देश / विदेश

पतंजलीवर सरकारची कृपादृष्टी, विरोधक आक्रमक

मुंबईः योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीची उत्पादने सरकारी सेवेप्रमाणे विकण्याचा घाट सरकार आखत आहे. या निर्णायाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आपले सरकार’ सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असल्यास 2 सेवा केंद्र स्थापन केले जातील. तर शहरी भागात 24 हजार लोकसंख्येमागे एक आणि नगरपंचायत भागात 5 हजारांहून अधिक लोकसंख्या असल्यास 2 केंद्र स्थापन केली जातील, त्याद्वारे बाबा रामदेव यांची उत्पादने विकण्याचा सरकारचा विचार आहे. दरम्यान, या पत्राकानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत, सरकार पतंजलीवर एवढे मेहरबान का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर मॉब लिंचिंगमागे कोणतेही धार्मिक कारण नाही, धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करू नका !

News Desk

मोदी आणि राज यांच्यात का..रे…दुरावा..!

swarit

ती सेक्स सीडी बनावट, हार्दिकचे भाजपवर आरोप

News Desk