HW News Marathi
देश / विदेश

‘५४ कारखान्यांचीही चौकशी झाली पाहिजे’, चंद्रकांत पाटील अमित शहांना लिहिणार पत्र

पुणे | सध्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम चर्चेत असतात. अशात अजित पवारांच्या नातेवाईकाचा जरंडेश्वर कारखाना सध्या गंभीर चर्चेचा विषय बनला आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी या विषयावर आपली मतं, वक्तव्यं मांडली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (३ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सर्वच ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे असं पत्रं लिहून मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

भाजपच्या काळात काही भ्रष्टाचार झाला असेल तर ही प्रकरणं काढायला कुणी अडवलं?

५४ साखर कारखान्यांची कवडीमोल भावात विक्री झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. जरंडेश्वर तर हिमनगाचं एक टोक आहे. या त्या कारखान्यांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी अमित शहा यांच्याकडे पत्रं लिहून मागणी करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं. भाजपच्या काळात काही भ्रष्टाचार झाला असेल तर ही प्रकरणं काढायला कुणी अडवलं?, असा सवालही त्यांनी केला.

शिवसेनेला लगावला टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे ते नेहमी दिल्लीत जात असतात. ते तिकडे कुणाला भेटले त्याबद्दल माहीत नाही, असं सांगतानाच राऊत हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते एकमेव नेते आहेत. शिवसेनेकडे त्यांच्या व्यतिरिक्त बाकी नेते नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

ईडीने ४९ साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं हजारे म्हणाले होते. साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि पार्ट्यांचं काही घेणं नाही. सहकार चळवळ टिकली पाहिजे. तिचं खासगीकरण होणं हा धोका आहे, असंही ते म्हणाले होते.

अजित पवार आणि अनिल परबांची CBI चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचे थेट अमित शहांना पत्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची CBI चौकशी करावी, अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये याबाबतचा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसं निवेदन पाठवले आहे.परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि परब यांचीही करावी, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणार्‍यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे धक्‍कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहेत, असा आरोपही या ठरावात करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवू | नाना पटोले

News Desk

केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर आणली बंदी, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ!

News Desk

संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने आदित्यनाथ यांचे उदयनराजेंनी मानले आभार

News Desk