HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्य़ांसाठी 90 कोटींचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर,

हेलिकॉप्टरची हवा आणि हाव काही सुटेना

मुंबईःदोन वेळा अपघातातून वाचलेल्या मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा सोस आजही कायम दिसत आहे. 65 कोटींचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर लातूरमध्ये अपघातग्रस्त झाल्यानंतर आता आणखी अत्याधुनिक, सुमारे 90 कोटी रुपये किमतीचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा विचार राज्यसरकार करत आहे. हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री व राज्य सरकारने कुठलाही धडा न घेता तिजोरीला भगदाड पाडण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसते.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला हेलिकॉप्टरचा फॅन लागता लागता राहिला. मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तिच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे चव्हाट्यावर आला. त्यानंतर खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणे मुख्यमंत्र्यांनी टाळण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पुन्हा मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरमधून फिरण्याची हौस झाली आहे. त्यामुळे नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा राज्यसरकारसमोर प्रस्ताव आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्यावर चर्चा करण्यात आली. त्यासाठी 90 कोटी खर्च करण्याचीही राज्य सरकारने तयारी चालवली आहे. एकूणच अपघातातून धडा न घेणाऱ्या सरकार व मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून हेलिकॉप्टरची हवा आणि हाव काही सुटत नसल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लिलाव बंद होऊन आता डेपोतूनच प्रती ब्रास वाळू ६०० रुपयांत मिळणार! – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

‘युरोप ट्रिपदरम्यान एक पेंटिंग पाहून घाबरला होता सुशांत’; चौकशीदरम्यान रियाचा नवा खुलासा

News Desk

‘त्या’ टोलनाक्याच्या प्रकरणावरुन उदयनराजे भोसले झाले आक्रमक!

News Desk
मुंबई

मुंबई पोलिस वाय-फाय युक्त

News Desk

मुंबईः वाहतूक पोलिसांसह चालकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा लावण्यात येणार आहे. नेहमीच्या वॉकी-टॉकी आणि लवाजमाशिवाय पोलिसांना आता हा वायफाय कॅमेराही सोबत बाळगावा लागणार आहे. या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.

त्यामुळे एखादा व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण किंवा अरेरावी करेल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रुमला जाईल. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार आहे.

Related posts

मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त अस्थापना आणि प्रशासनासाठीच्या खर्चाची केलेली बेगमी -सचिन अहिर

News Desk

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

प्रत्यारोपणासाठी ‘यकृताचा’ ठाणे ते दादर लोकलप्रवास

News Desk