HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ टोलनाक्याच्या प्रकरणावरुन उदयनराजे भोसले झाले आक्रमक!

सातारा | महाविकासआघाडी सरकार आणि राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष असलेला भाजप पक्ष यांच्यात सातत्याने काही ना काही कुरघोडी सुरुच आहेत. सरकारने भाजपचे खासदार उदयनराजे यांना आता एक जोरदार धक्का दिला आहे. सातारा-कोल्हापूर महामार्गावरील साताऱ्यातील आणेवाडी आणि पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यांचं अशोक स्थापत्य कंपनीला दिलेलं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे. ही कंपनी भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या निकटवर्तीयांची आहे. अशोक स्थापत्यकडून काढून घेण्यात आलेलं कंत्राट पुण्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. हा निर्णय छत्रपती उदयनराजे भोसलेंना राजकीय धक्का मानला जात आहे.

यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला सुनावले आहे. ‘पुणे-सातारा महामार्गाचे काम २०१३ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र, गेली ८ वर्ष हे काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे टोलवाढ करण्याऐवजी कपात केली पाहिजे, अशी मागणी उदयमराजे भोसले यांनी सरकारकडे केली आहे. सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे ५ टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पहाणारी आहे’, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे 5 टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पहाणारी आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सन 2013 मध्ये पूर्ण होणार होते. मुळची मुदत संपूनही सुमारे 8 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही म्हणूनच 5 टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या टोलदरात 5 टक्केपेक्षा जास्त टोल करकपात करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाश्यांना करावा लागत आहे. असलेले सेवा रस्ते अत्यंत खराब आहेत. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत का नाहीत हे देखिल समजत नाही. रस्त्यांवरील खड्डयांची तर मोजदाद ही करता येत नाहीत इतके असंख्य खड्डे आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खरंच आहे का असा प्रश्न वाहनचालकांना आणि प्रवाशांना पडत असतो. दिशादर्शक- स्थलदर्शक फलकांची वानवा आहे. काही वेळा अपरिचित वाहनचालकांला एखादे गांव कधी आपण मागे टाकले हे देखिल कळत नाही.

ट्रक ले-बाय, शौचालय सुविधा इत्यादी बाबी तर सुरुवातीपासूनच गायब आहेत. शेजारील कर्नाटक राज्यातील याच राष्ट्रीय महामार्गावरुन आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यांपेक्षा कमी टोल दर देवून, प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवाशी हे सातारा पुणे प्रवासादरम्यान प्रत्येक असुविधेबाबत आणि खडयांबाबत अक्षरश: लाखोली वहात असतात.

या व अश्या सारख्या अनेक सुविधांची असलेल्या वानवा लक्षात घेता, सध्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथेंरिटी ऑफ इंडियाने) आणि टोल चालवणा-या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करुन, प्रवाशी आणि वाहनचालक/धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी तसेच नुसती दरवाढ मागे न घेता, जुन्या दरात 5 टक्यापेक्षा जास्त रक्कमेची टोल करकपात करावी अशी आग्रही मागणी नागरीक- प्रवाशी आणि वाहनचालकांच्या वतीने आम्ही करत आहोत.

काय आहे प्रकरण?

अशोक स्थापत्य कंपनी उदयनराजे भोसलेंचे समर्थक असलेल्या अशोक सावंत यांची आहे. ३ एप्रिलला हे व्यवस्थापन बदललं जाणार आहे. त्यामुळे टोलनाक्यांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा ते पुणे मार्गावरील २ टोलनाक्यांचं व्यवस्थापन येत्या ३ एप्रिलपासून बदललं जाईल. यात साताऱ्यातील आणेवाडी आणि पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यांचा समावेश आहे. या दोन्ही टोलनाक्यांचं व्यवस्थापन सध्याच्या घडीला अशोक स्थापत्य कंपनीकडे आहे.

उदयनराजेंची सरशी आणेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरून बरंच राजकारण घडलं आहे. या टोलनाक्याचं व्यवस्थापन आपल्याकडे राहावं यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थक नगरसेवकानं बराच जोर लावला होता. त्यामुळे उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र या टोलनाक्याचं कंत्राट उदयनराजेंचे समर्थक असलेल्या अशोक सावंत यांच्याकडेच राहिलं.

दोव्ही टोलनाक्यांचं व्यवस्थापन अशोक सावंत यांच्याकडून काढून घेऊन ते पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके आणि शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारनं उदयनराजे भोसलेंना शह दिल्याची चर्चा चांगलीच रंगण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती द्यावी –अर्जुन खोतकर

News Desk

एखाद्या वाक्याने व्यक्ती वाईट होत नाही !

swarit

चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसूनही पंतप्रधान इतके थंड कसे?

News Desk