HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेची वेळ केव्हाच निघुन गेली !

आमदार-नगरसेवक निघून गेले ना… त्याचे काय?

मुंबई:दादरमध्ये मनसेने – ‘अजून वेळ निघून गेलेली नाही’- असे बॅनर्स लावलेले आहे. प्रत्यक्षात मात्र मनसेची वेळ केव्हाच निघून गेेलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपसोबत युती होईल, या आशेवर राज ठाकरे थांबले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेपुढे झुकतं घेत दिलजमाईचा प्रयत्नही करुन पाहिला. पण शिवसेनेने त्यांना त्यांची जागा दाखवली. खरंतर, काही दिवसांपूर्वी, ही पालिका निवडणूक न लढवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता. मात्र पक्षातल्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली, व असं केल्यास आपला उरलासुरला बेससुद्धा संपेल, असं सांगितलं. तेव्हा कुठे मनसेअध्यक्षांचे डोळे उघडले.

दादरमध्ये वेळ निघून गेलेली नाही, असे बॅनर्स लावलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र पक्षाचे वसंत गीते, प्रवीण दरेकर, राम कदम, मंगेश सांगळे या आमदारांसह 150 हून अधिक नगरसेवक पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आवाहन करण्यापूर्वी आपल्या पक्षाची वेळ निघून गेल्याचं भानही या लोकांना राहिलं नसल्याची टीका सर्वसामान्यांतून केली जात आहे. शिवसेनेने मनसेचा युतीता प्रस्ताव नाकारल्यामुळे आता या पक्षाच्या उरल्यासुरल्या आशा-आकांक्षा पण नष्ट झाल्या आहेत.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | ३६ जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही, पुढची दिशा आज ठरणार

News Desk

राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ३१५ कोटींच्या निधीला मंजुरी

Aprna

गेली ५० वर्ष काम करण्याची संधी मला महाराष्ट्राच्या जनतेने दिली – शरद पवार

News Desk