HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा मूकमोर्चांवर बंदीस न्यायालयाचा नकार

आरक्षणाचा विषय ओबीसी आयोगाकडे सोपवण्याबाबत राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणे सादर करावे – मुंबई उच्च न्यायालय

पी.रामदास

मुंबई – मराठा मूक मोर्चांवर बंदी घालण्याची विविध याचिकाकर्त्यांची मागणी आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या आज झालेल्या सुनावणीदरम्यान अनेक याचिकाकर्त्यांसह राज्य सरकारने मराठा आऱक्षणाचे प्रकऱण ओबीसी आयोगाकडे पाठविण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यावर मराठा आरक्षणाचे प्रकरण आम्ही कुठेही पाठवणार नसल्याचे स्पष्ट करत राज्य सरकारला यासंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. याप्रकरणातील पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावनी दरम्यान अँड. सागर किल्लारीकर यांनी मराठा मूकमोर्चांवर बंदी घालण्याची विनंती न्यायालयास केली. यावर याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकिल अँड. विजय किल्लेदार यांनी मूकमोर्चांमुळे राज्यात एकही हिंसक घटना घडली नाही, या मूकमोर्चांबाबत कुणाचीही साधी तक्रार नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मोर्चा काढणे हा राज्य घटनेने दिलेला अधिकार असून हे सर्व मूकमोर्चे होते, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने मूकमोर्चांवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

मराठा आऱक्षण प्रकरण ओबीसी आयोगाकडे सुपूर्द करण्याची मागणी काही याचिकाकर्त्यांसह राज्य सरकारने न्यायालयाकडे केली होती. यावर न्यायालयाने मराठा आऱक्षण प्रकरण आपण कुठेही पाठवणार नसून यासंदर्भात राज्य सरकारने आपले म्हणणे तीन आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे !

News Desk

शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली, देशमुखांवरुन फडणवीसांचा थेट आरोप

News Desk

अर्णब गोस्वामीवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली: सचिन सावंत

News Desk
देश / विदेश

युनिटेकच्या चंद्रांना अटक

News Desk

नवी दिल्ली युनिटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. काही वर्षांपूर्वी ग्रेटर नोएडा येथील घरबांधणी प्रकल्पात युनिटेक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. या खरेदीदारांनी २००६ मध्ये ग्रेटर नोएडामध्ये घरांसाठी पैसे भरले होते. एप्रिल २००८ मध्ये या घरांचा ताबा मिळेल, असे कंपनीतर्फे खरेदीदारांना सांगण्यात आले होते. मात्र, युनिटेक कंपनीला नियोजित वेळेत ग्राहकांना घरे देण्यात अपयश आले होते. गेल्यावर्षी दिल्लीतील न्यायालयाने याप्रकरणी युनिटेकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी जानेवारी २०१६ मध्येही संजय चंद्रा यांच्यासोबत युनिटेकचे अध्यक्ष रमेश चंद्रा, एमडी अजय चंद्रा आणि संचालिका मिनोती बाहरी यांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांना एक दिवस तुरूंगात राहवे लागले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०१६ रोजी या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

Related posts

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

Gauri Tilekar

#9pm9minute : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ‘कोरोना’चा अंधकार दूर करण्यासाठी देशवासियांनी लावले दिवे

News Desk

रेल्वेच्या एसी कोचमध्ये झोपण्यासाठी आणा घरचे कपडे..

News Desk