HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली, देशमुखांवरुन फडणवीसांचा थेट आरोप

मुंबई | राज्यात सध्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप केले त्यावरुन राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे. याचं मुद्द्यावरुन आज (२३ मार्च) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड़णवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सुरुवातीलाच बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा मुद्दा राष्ट्रीय केल्यामुळे पत्रकार परिषदेची सुरुवात हिंदीत करुयात असा टोमणीाही लगावला. पुढे त्यांनी असं म्हटलं की, गृहमंत्री अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा करतानाच शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून आता देशमुख एक्सपोज झाले आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो नंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला असल्याने आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून मी आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरु करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर पत्रकरांना इंग्रजी इंग्रजी असा उच्चार केला. त्यावेळी फडणवीसांनी त्यांच्याइतकं माझं इंग्रजी चांगलं नाही, असेही फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२२ मार्च) गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पवारांचे दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेले. पवारां इतकं माझं इंग्रजी चांगलं नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा रोख काय असणार आहे हे स्पष्ट केलं आहे.

पोलिसांच्या दैनंदिन कार्यक्रमानुसार देशमुख मुंबईत

१५ तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असं फडणवीस म्हणाले.

१५ तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते

काल पवारांना योग्य ब्रिफिंग दिली जात नव्हते. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते.१५ तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे फडणवीसांच्या या दाव्यामुळे पुढे या प्रकरणाला काय दिशा मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही बहिण-भाऊ आहेत, आमच्या नात्यात पक्ष आणि राजकारण येऊच शकत नाही –  पंकजा मुंडे

News Desk

शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर, पुढील ३ महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

News Desk

‘करुणा शर्मा यांनी मदत मागितल्यास ती देणार बीड भाजप’ – राजेंद्र म्हस्के

News Desk