HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात थंडीचा कडाका वाढला साताऱ्यात तापमानाची नीचांकी नोंद 

शुभम देशमाने

सातारा – राज्यात नववर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीचा कडाका वाढलेला पाहायला मिळतोय. त्यातच रविवारी साताऱ्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात या हिवाळ्यात पहिल्यादाच ७. २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दुसऱ्या दिवशीही तापमानात हलकीशी वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उत्तरभारतातील गार वारे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने राज्यात तापमान कमी झाले आहे, परिणामी थंडीचा कडाका जाणवतोय. याचा परिणाम हा वाहतुकीवरही पाहायला मिळतोय. धुक्यांमुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक मंदावलेली आहे. मार्गावरील दाट धुक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना वाहतुकीत त्रास होतोय . याबाबत वाहनचालकांनी काळजीपूर्वक आपली वाहने चालवावीत असा ईशारा पोलीसांनी यावेळी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर गोवऱ्या पेटवल्याने खळबळ, मराठा आरक्षणाचे साताऱ्यात पडसाद

News Desk

मंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

News Desk

पाहा व्हिडिओ : पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी; हायटेक शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Aprna