HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी

मुंबईः राज्यात गेल्या 24 तासांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने रेल्वेसेवेवर परिणाम झाला. अनेक लोकल रेल्वे उशिराने धावत होत्या. काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान येत्या 24 तासांत पुन्हा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने मुंबईकरांनसाठी पुढील दोन दिवस जिकरीचे ठरणार आहे.

मुंबईलगतच्या उपनगरामध्ये ठाणे, कल्याण, पालघर, पनवेल, रायगड परिसरालाही पावसाने झोडपून काढले आहे. या ठिकाणी अनेक नद्या नाल्यांना पूर आला. अनेक घरांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील नद्या दुधडी भरून वाहत आहेत. तेथील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खान्देश, विदर्भातही जोरदार पाऊस झाला. तिकडे नागपूरमध्येही पावसाने नागरिकांची दैना केली. पाऊस काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळ – विखे पाटील

News Desk

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथचे कौतुक

Aprna

महाराष्ट्राला संकटात आणण्याचा प्रयत्न सुरु, राऊतांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पलटवार  

News Desk