HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथचे कौतुक

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळावरील, विशेषत: मशिदीवरील भोंगे उतरविल्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार मानले आहे,” असे पत्र राज ठाकरेंनी आज (२८ एप्रिल) ट्वीट केले आहे. भोंग्याच्या मुद्द्यांवरुन राज्याचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्यभरातील सर्व भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. महाराष्ट्र दिना निमित्ताने राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहीर सभा येणार आहे. परंतु, औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी अद्याप दिलेली नाही. 

राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचीरणी प्रार्थना.” या ट्वीटमध्ये त्यांनी अजान आणि लाउडस्पीकर ट्वीट दिले आहे. या ट्वीट राज ठाकरेंनी मराठी आणि इंग्रजीत पत्र लिहिले आहे.   

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुर्घटनाग्रस्तांना मोफत अन्नधान्य पुरवणार,’ छगन भुजबळांची माहिती!

News Desk

स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची रचना, धोरण लवकरच निश्चित करणार – धनंजय मुंडे

News Desk

आम्ही वाघाच्या काळजाचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार ,मुख्यमंत्रीप्रताप सरनाईकांच्या पाठिशी !

News Desk