HW News Marathi
महाराष्ट्र

आरपीआयला महाराष्ट्रात उमेदवार उभे करता येत नाही .. विलास गरुड 

उल्हासनगर रामदास आठवलेना महाराष्ट्रातच उमेदवार उभे करता येत नाही, ते काय उत्तर प्रदेश मध्ये काय निवडणूक लढवणार अस मत बहुजन समाज पार्टी चे प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी उल्हासनगर मध्ये व्यक्त केलं ,ते बसपा च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगर मध्ये जन कल्याणकारी समारोह आणि जाहीर सभेसाठी सुभाष टेकडी परिसरात आले होते .

बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सर्वच महानगरपालिका निवडणूक लढणार असून उल्हासनगरात सर्वच प्रभागात आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचं बहुजन समाज पार्टी चे प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी उल्हासनगर मध्ये व्यक्त केलं ,ते बसपा च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगर मध्ये जन कल्याणकारी समारोह आणि जाहीर सभेसाठी सुभाष टेकडी परिसरात आले होते .रामदास आठवले उत्तर प्रदेश मध्ये आर पी आय चे उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहेत तसेच आठवलेन मुळे भाजपाला उत्तरप्रदेशात फायदा होणार का ? असा प्रश्न गरुड यांना पत्रकारांनी केला असता, रामदास आठवलेना महाराष्ट्रातच उमेदवार उभे करता येत नाही, ते काय उत्तर प्रदेश मध्ये काय निवडणूक लढवणार असं मत यावेळी त्यांनी मांडलं. या देशामध्ये निळ्या झेंड्याचा शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेचा एकच पक्ष आहे तो म्हणजे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात पक्ष नसून एका एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ,त्यांना राष्ट्रीय पक्षाची मान्यता नसल्याची टीका गरुड यांनी आर पी आय च्या विविध गटांना अप्रत्यक्षपणे केली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार

News Desk

१०वी-१२वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, विद्यार्थ्यांना अफवांना बळी न जाण्याचे आवाहन

News Desk

“आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा”; भाजपचा ठाकरेंवर निशाणा

News Desk