HW News Marathi
महाराष्ट्र

“आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार”

पुणे | गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडीचे सरकार कमालीचे अडचणीत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजप पुन्हा एकदा शिवसेनेसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आगामी काळातील आघाड्यांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे.

आज (६ एप्रिल) भाजपचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपाच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत मोठे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील तिसरा राजीनामा येईल, असे भाकित केले. त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फक्त चंद्रकांत पाटीलच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांकडून सरकारमधील आणखी काही मंत्र्यांची खुर्ची जाणार असं म्हटलं जात आहे.

“देशमुखांचा राजीनामा प्रचंड नाचक्कीनंतरचा”

“ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे” अशा शब्दात भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर निशाणा साधला. “राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरुवात असून पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?” असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला.

“निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.” असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला.“जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे” असा इशारा महाजनांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaHearing : अयोध्या सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षांच्या वकीलाने फाडला नकाशा

News Desk

गृह विभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज; गृहमंत्री आणि शरद पवारांची बैठक

Aprna

काँग्रेसला आधी जनतेने झिडकारलं, त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही झिडकारलं, भाजपची बोचरी टीका

News Desk