HW News Marathi
महाराष्ट्र

“मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद व निरर्थक”- अतुल भातखळकर

मुंबई | मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सूरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय केवळ धूळफेक असून सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असताना केवळ रात्री व दुपारी प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनामुळे लोकल बंद करून आज 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यास कोरोना वाढेल असे कारण देणाऱ्या ठाकरे सरकारने दुसरीकडे मात्र दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, बाजारपेठा, बसेस, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षाच्या सभा आदी सर्व सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील उपनगरे व शेजारील शहरांमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

त्यातही पूर्व व पश्चिम महामार्गावर होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडी मुळे चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केले आहे, अशी टीका सुद्धा भातखळकर यांनी केली आहे. राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सर्वसामान्यांसाठी तात्काळ लोकल सुरू करावी, अन्यथा भारतीय पक्षा तर्फे मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा सुद्धा भातखळकर यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट व नील सोमय्यांशी संपर्क होत नसल्याची गृहविभागाची माहिती

Aprna

आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला उभे करण्यासाठी रोजगाराभिमुख प्रकल्प उभारावे! – विजय वडेट्टीवार

Aprna