HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रपती निवडीनंतर राज्यात शिवसेनेला सत्तेतून डिच्चू ?

मुंबईः राष्ट्रपतीपदाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या राजकारण भूकंप होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे विरोधी गोटातील जवळपास काही आमदारांनी एनडीएचे उमेदवारी रामनाथ कोविंद यांना मतदान केले आहे. हेच आमादार भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला वेळोवेळी अडचणीत आणणाऱ्या शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. या निकालानंतर भाजप शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर राज्यात सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात भाजपला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे वरवर दिसत असले तरी शिवसेना सत्ताधारी तसेच विरोधकांची भूमिका निभावत आहेत. शिवसेनेचा पाठिंबा असल्याने सत्ता टिकून असल्याने भाजपला वारंवार नमेत घ्यावे लागत आहे. परंतु संघ विचासरणीवर वाढलेला हा पक्ष कधी कुणाचे वर्चस्व सहन करण्यास सहजासहजी तयार होणे अशक्य. त्याचसाठी त्यांनी वेगली चुल मांडण्याचा डाव आखलेला आहे. तोही राष्ट्रपती निवडणुकीच्या माध्यमातून. एकीकडे शिवसेनेला विरोधकाची भूमिका निभावण्याची संधी द्यायची तर दुसरीकडे राष्ट्रवादी, कॉँग्रेसला जवळ करण्याची धूर्त खेळी भाजप खेळत आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या माध्यमातून ही बाब प्रकर्षाणे आधोरेखित झाल्याचे गुरुवारच्या निकालनंतर दिसून येणार आहे.

शिवसेनेला सत्तेतून हटवून त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सत्तेत राहणार हा संदेश भाजपला या निवडणुकीच्या माध्यमातून द्यायचा आहे. त्यासाठी हा सर्व खटाटोप भाजपच्यावतीने संघ करत असल्याचे जाणकारचा अंदाज आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदावर रामनाथ कोविंद विजयी ठरणार आहेत. त्यानंतर महराष्ट्रात भाजप शिवसेनेचा पाठिंब्याशिवाय स्वबळावर सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षक पाठिंबा लाभल्यास भाजप शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालायचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Aprna

सांगा पालकमंत्री गेले कुणीकडे? राम कदमांचा सरकारला सवाल

News Desk

अब्दुल सत्तार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर दाखल

News Desk