HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापुढे केवळ बीएस-IV मानकांच्या वाहनांचीच नोंदणी होणार

उत्तम बाबळे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे बीएस-IV मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची विक्री वाहन उत्पादक किंवा विक्री करता येणार नाही. वाहन नोंदणी प्राधिकारी यांनाही एक एप्रिल 2017 पासून बीएस-IV मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करता येणार नाही. तथापि, वाहनाची विक्री 31 मार्च 2017 ला अथवा त्यापूर्वी केली असेल, तर वाहन विक्रीचा पुरावा सादर केल्यावर मात्र अशी नोंदणी करता येईल, असे परिपत्रक राज्याच्या परिवहन आयुक्तालयाने केले आहे.

या परिपत्रकात म्हटले आहे की, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 115 मध्ये वाहनांच्या वायूप्रदूषण विषयक मानकांबाबत तरतूदी विहित केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन (सिविल) मध्ये 29 मार्च 2017 रोजी बीएस-III वाहनांच्या नोंदणीबाबतही आदेश पारित केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता सर्व नोंदणी प्राधिकारी यांनी शनिवार 1 एप्रिल 2017 पासून बीएस-IV या वायूप्रदूषणाची मानकांची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांची नोंदणी करू नये. तथापि जर 31 मार्च 2017 ला अथवा त्यापूर्वी बीएस-III मानकांची वाहने विकण्यात आली असतील तर वाहन विक्रेत्याने त्याबाबतचा पुरावा सादर केल्यास अशी वाहने नोंदणी करीता स्वीकारण्यात यावीत.

वाहन विक्रीच्या पुरावा म्हणून फॉर्म 21, इन्व्हाइस बील, विमा प्रमाणपत्र, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी बाबींचा विक्रीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. शुक्रवार 31 मार्च 2017 ला अथवा त्यापुर्वी बीएस-III वाहनांची तात्पुरती नोंदणी केलेली असेल तर अशी वाहने नोंदणीसाठी स्वीकारता येतील. वाहनाचे उत्पादन महिना व वर्ष हे सदर वाहनास केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 126 अन्वये मान्यताप्राप्त तपासणी संस्थेद्वारे जारी केलेल्या मान्यता प्रमाणपत्रामध्ये उत्पादकाने घोषीत केलेल्या चेसीस कोडीफिकेशनवरुन पडताळणी करावी. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशास अनुसरून संबंधित नोंदणी प्राधिकारी यांनी वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही राज्याचे अपर परिवहन आयुक्त स. बा. सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजपा गप्प का? नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का?रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्या.

News Desk

चक्क विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा…..

Ruchita Chowdhary

अर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेस आक्रमक, शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन

News Desk