HW News Marathi
महाराष्ट्र

हार्दिक पटेल सेनेच्या जाहिर सभेत

मुंबई गजरातचे धडाडीचे नेते हार्दिक पटेल आज शिवसेनेच्या जाहिर सभेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता गोरेगाव (प) रेल्वे स्टेशन जवळील स्टर्लिंग हॉलमध्ये होणाऱ्या या जाहिर सभेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रभाग क्र 55चे शिवसेना उमेदवार बिरेन लिंबाचिया उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेस आक्रमक, शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन

News Desk

राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम; कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Aprna

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna
मनोरंजन

 नाना पाटेकर शहिदांच्या कुटुंबियांना मदत करणार

News Desk

मुंबई – रूपेरी पडद्यावरील नायकाला अपेक्षित काम प्रत्यक्षात सुरू केलंय अभिनेता नाना पाटेकर यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याची इच्छा नाना यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाना यांनी मदतीसंदर्भात घोषणा केली आहे.

, ‘ भारतीय जवान कोणत्‍या परिस्थितीमध्‍ये काम करत असतात, हे सर्वांना ठाऊक आहे. त्‍यांचे कुटुंबही कोणत्‍या मनोभूमिकेत जगत असतील, याचा आपण विचार करु शकतो. विशेषत: शहिद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवत असेल, म्‍हणूनच अशा कुटुंबियांसाठी नाम फाउंडेशन आता 10 कोटी रुपयांचा निधी जमा करणार आहे, असे नाना यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

इतकी मोठी रक्‍कम जमा करणे काही सोपे उद्दीष्‍ट नाही. मी वैयक्तिक 50 लाख रुपये देणार आहे. आणखी 9.50 लाख रुपये जमा करायचे आहे. म्‍हणून प्रत्‍येक भारतीयाला माझी विनंती आहे की, जवानांच्‍या सेवेसाठी जमेल तितकी मदत प्रत्‍येकाने करावी. सर्वांनी अगदी मनापासून नाम फाउंडेशनच्‍या मिशनमध्‍ये सहभागी झाले पाहिजे. जेणेकरुन जवानांसाठी आपण काहीतरी करु शकू.’

याव्‍यतिरिक्‍त नाना पाटेकर महाराष्‍ट्रातील दुष्‍काळ पिडीत शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनसोबत काम करत आहे. अनेक दुष्‍काळग्रस्‍त गावांत नाम फाउंडेशनने जलसंवर्धनाचे काम केले आहे. त्याचे सकारात्मक प्रतिसादही दिसू लागले आहेत.

 

Related posts

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम

News Desk

इंडियन आयडाॅलच्या स्पर्धकाला १ लाख ७० हजारांचा गंडा

News Desk

श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

News Desk