HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील आणखी एकाचा मृत्यू, राज्यातील कोरोनाचा चौथा बळी

मुंबई | मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरनाचा चौथा बळी गेला आहे. ६५ वर्षीय कोरोनाबाधितच्या मृत्यबनंतर आता सरकारही चिंतेत आले आहे. दरम्यान, आज (२४ मार्च) पुण्यानंतर मुंबईतुनही दिलासादायक बातमी आली होती. पुण्यातील दोन रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील १२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. .तर औरंगाबादमधील एका कोरोनाबाधित महिलेला घरी सोडण्यात आले. पुन्हा एकदा मुंबई आणि पुण्यातील रूग्णांची चाचणी घेण्यात येणार असून नंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ झाला आहे. मात्र महाराष्ट्र प्रशासन हा आकडा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशामध्ये यामुळे ५०० पेक्षा जास्त रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.सध्या महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे,तरीसुद्धा लोक ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. तसेच, आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ८ वाजता भारतीयांना संबोधित करणार आहेत. ते काय बोलणार याची उत्सुक्ता सगळ्यांनाच लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज तयार करणार ! – नाना पटोले

Aprna

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचा ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकला

News Desk

तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, कंगनाचा सरकारला टोला

News Desk