HW News Marathi
महाराष्ट्र

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचा ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकला

अहमदनगर | राज्यात आज (१८ जानेवारी) ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. पाटोद्यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे यांच्या गावात म्हणजेच राळेगणसिद्धीमध्ये कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर अण्णांच्या विचारांच्या ग्रामविकास पॅनलने राळेगणसिद्धीमध्ये सर्वच्या सर्व 7 जागा जिंकल्याचे समोर आले आहे.

राज्यात ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होत असली तरी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे पटोदा, पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, आणि ज्येष्ठ जमाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी या तीन गावांच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा रंगली होती. कायम चर्चेत असणाऱ्या या गावांमध्ये कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते.

प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यांनतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. या गावांपैकी पाटोद्यात सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा पराभव झाला. तर हिवरे बाजारातून पोपटराव पवार यांचं पॅनल जिकंलं आहे. यानंतर राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी सत्ता कायम राखत येथील ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक!

News Desk

मराठा समाजाच्या रोषाला हे लोक जबाबदार…

News Desk

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk