HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, कंगनाचा सरकारला टोला

मुंबई | जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्याविरोधात उभी राहते आणि जिंकते, तेव्हा तो त्या व्यक्तीचा विजय नसतो, तर लोकशाहीचा विजय असतो, असं म्हणत अभिनेत्री कंगना राणावत हिने ठाकरे सरकारवर पलटवार करत म्हटले आहे. ज्यांनी मला धैर्य दिले, त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांची चेष्टा केली त्यांचेही आभार. तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, असा टोलाही तिने ठाकरे सरकारला लगावला आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1332204021591859200?s=19

 

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर कंगनानं ट्विट करत भावनांना वाट मोकळी करून दिली. अभिनेत्री कंगना राणावतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकामप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे.

कंगनाची वास्तू नवी नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर आहे. महापालिकेने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. हायकोर्टाने मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना कंगनाच्या नुकसानभरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार 

News Desk

भोकर न.प.इतिवृतात खाडाखोड करणा-यांविरुद्ध कारवाई करा

News Desk

जाणून घ्या १० वी-१२ वीचा निकाल कधी जाहीर होणार

News Desk