HW News Marathi
महाराष्ट्र

‘राणे, भारती पवार, कपिल पाटील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं प्रॉडक्ट,’ राऊतांचा टोला!

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रकारे चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे, असं असताना मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रिपदाचा बहुमान मिळाला यामध्ये खासदार नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. कराड सोडले तर इतर तीनही नेते दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.कपिल पाटील आणि भारती पवार राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहेत. नारायण राणे शिवसेना काँग्रेस करत भाजपमध्ये गेले आहेत. हे पाहिल्यावरती मुळ चेहरा मंत्रिमंडळाचा पूर्णपणे राष्ट्रवादी शिवसेनेचाच आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

क्षमता पाहूनच मंत्रिपदं दिली असतील-

“केंद्रात पाहीलं, केंद्रात सुद्धा अनेक जुने जाणकार बाजूला आहेत. बाहेरुन आलेली अनेक प्रमुख लोकं आहेत, ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत, पण ते त्यांच्यामध्ये सक्षमता पाहून दिलं असावं. नविन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान द्यावं. विशेषत: आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, नारायण राणे यांच्या रोजगार निर्माण करण्याची, लहान उद्योगांना जो पूर्णपणे या काळामध्ये मरुन पडला आहे, त्यांना संजिवनी देण्याचं काम राणेंनी करावं,” असं संजय राऊत म्हणाले.नवनिर्वाचित मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार, त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीतून देश चालला आहे. महागाई असेल, आर्थिक विषय असतील, आरोग्य विषयक आणीबाणी असो, बेरोजगारी आहे, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबादारी आलेली आहे. मोदींनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसलेले आहेत.

जावडेकरांसारखा मोहरा पडलेला-

महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रीपदं आलेली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडलेला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेल्या. नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं त्यांना दिलं. खरंतर नारायण राणे यांची कामाची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक मंत्रीपदं त्यांनी सांभाळली आहेत.

पण त्यांना आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं दिलं आहे. महाराष्ट्र आणि देशामध्ये या माध्यमातून मोदींना जी काही अपेक्षा आहे, विशेषत: रोजगार वाढवण्याचं, हे एक मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. पण एकमात्र, भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत, आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला आहे, मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk

“एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna

“पॅकेजवर माझा विश्वास नाही जे गरजेचं आहे ते करणार,” उद्धव ठाकरेंचं कोकणवासीयांना आश्वासन

News Desk