HW News Marathi
महाराष्ट्र

पटोले वाद आता राहुल गांधींच्या दरबारात?, थोरात, राऊत दिल्लीत दाखल

नवी दिल्ली। राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात आज अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. ते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत मतभेदावरून ते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. खास करून पटोले आणि राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्याची तक्रार राहुल गांधी यांच्याकडे केली जाण्याची शक्यता आता माध्यमांमध्ये वर्तवली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नाना पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत थेट राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत आता दाखल झाले आहेत.

राहुल गांधींकडे होणार तक्रार-

राहुल गांधी यांची भेट घेऊन ते पटोले यांची तक्रार करणार असल्याचं आता पुढे येत आहे. नितीन राऊत यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आहेत. राऊत आणि थोरात एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या तणावाचं वातावरण असल्याच्या चर्चांमुळे आता तर्क-वितर्क लढवले जातात. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर आली होती. तेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाची हायकमांडकडे मागणी देखिल केली होती. त्यातही त्यांनी ऊर्जा विभाग मिळण्याचे सूतोवाच केलं होतं. त्यावर नितीन राऊत नाराज झाले होते. आपलं पद जाऊ नये म्हणून राऊत यांनी दिल्लीवारीही केली होती.

दोघंही काँग्रेस नेत्यांचा काय होता वाद?

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खनिकर्म महामंडळाबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यात नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. यात नियमबाह्य प्रक्रिया झाली असून हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणातच अंतर्गत वाद पाहायला मिळाला होता, आणि एकच खळबळ उडाली. त्यावर नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. हे पत्रं ज्या विभागाला लिहिलं त्याने खुशाल चौकशी करावी, असं राऊत यांनी म्हटलं होतं. आमदार होण्यापूर्वी माझा कोळश्याचा व्यवसाय होता. पण हे पत्र माझ्याशी संबंधित नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यामुळे राऊत-पटोले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

पटोले-राऊत नेमकं प्रकरणआहे?

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खनिकर्म महामंडळाबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यात नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. यात नियमबाह्य प्रक्रिया झाली असून हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. हे पत्रं ज्या विभागाला लिहिलं त्याने खुशाल चौकशी करावी, असं राऊत यांनी म्हटलं होतं. आमदार होण्यापूर्वी माझा कोळश्याचा व्यवसाय होता. पण हे पत्र माझ्याशी संबंधित नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यामुळे राऊत-पटोले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. परंतु, अध्यक्षपद कुणाला द्यायचं यावरून काँग्रेसमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे या अधिवेशनातही अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही ही निवडणूक झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदावरूनही काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि वेणुगोपाल यांच्यासोबत हे दोन्ही नेते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर चर्चा करणार असल्याचं देखील आता बोललं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर!

News Desk

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ९९३ वर, एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त

News Desk

अब मै चल पडा मेरे राह की ओर….धन्यवाद नागपूर ! मुंढेंनी घेतला नागपूरकरांचा निरोप

News Desk