HW News Marathi
महाराष्ट्र

“प्रकाश आंबेडकरांनी सुट्टी का घेतली ?” ‘वंचित’ने जारी केले पत्रक

मुंबई। राज्यातील आणि देशातील अनेक नेते उन्हाळ्यात हवा बदलासाठी परदेशात सुट्टीवर जात असतात. त्यात काही नवीन नसते. ते सुट्टीवर गेले तरी पक्षाकडे आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असते. मात्र, एखादा नेता तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची घटना क्वचितच घडते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे ३ महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. आंबेडकर यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती काल ( ८जुलै ) ला दिली होती. आंबेडकर यांनी ३ महिने सुट्टीवर जाण्याचं कोणतंही कारण दिलं नव्हतं, वैयक्तिक कारणांसाठी सुट्टीवर जात असल्याचं त्यांनी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. आंबेडकर यांनी व्हिडीओ शेअर करून हे सांगितलं. त्यात त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं दिसून येत आहे. मग आंबेडकर सुट्टीवर का जात आहेत?, असा सवाल केला जात होता. वंचितने ५ जिल्ह्यातील निवडणुकांमधून अंग काढून घेतले आहे का? त्यासाठी आंबेडकरांनी सुट्टी घेतली आहे का?, असे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते आणि आता ह्या चर्चांना एक परिपत्रक काढून पूर्णविराम देण्यात आला आहे.

वंचितच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात येणार आहे तर ते सध्या आयसीयू मध्ये आहेत त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कारण नाही असे डॉक्टरांनी कळवले तरी देखील अजून काही दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या फेसबुक पेजवर रोज देण्यात येईल असे देखील नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विटद्वारे दिली होती माहिती

प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यातून त्यांनी ही माहिती दिली आहे. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असं आंबेडकर यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना कश्यप प्रकरणात लक्ष देण्यास सांगेल, आठवलेंचा पायल घोषला शब्द

News Desk

काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या साखर कारखान्यांना नोटिसा

News Desk

देश गरिबी महागाई मंदीच्या तिरडीवर ! गुजरातमध्येच पैशाचा पाऊस कसा ?

News Desk