HW News Marathi
महाराष्ट्र

“पंकजा आणि प्रीतम मुंडेंनी कधी पदाची अपेक्षा केली नाही”,पंकजा मुंडेंनी नाराजीवर केलं भाष्य

मुंबई। भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या लहान बहीण प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा वाऱ्यायासारख्या पसरल्या होत्या. आणि विरोधकांनी देखील हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना आता पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य देखील पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे.

मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांचा सूर असतांना पंकजा मुंडे यांनी आज (९ जुलै पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पत्रकार परिषदेत त्यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही, हे स्पष्ट केलं. इतकंच नाही तर त्यांनी प्रीतम आणि पंकजा मुंडे यांनी कशीही पदाची अपेक्षा केली नाही. केवळ पक्षासाठी काम केलं असं म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती, असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

का केलं नाही मंत्र्यांचं अभिनंदन?

या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी असं देखील स्पष्ट केलंय की मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही मुंडे म्हणाल्या.

हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं

भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काम करतोय ते फक्त पक्षासाठीच

पुढे बोलताना पंकजा मुंडे असे देखील म्हणाल्या, प्रीतम मुंडे या बाबांच्या मृत्यूनंतर उभ्या राहिल्या आणि जिंकल्या देखील त्यांच्या मेहनतीनेच. पुढे त्या असं देखील म्हणाल्या की, प्रीतम राजकारणात मिरवण्यासाठी आलीच नाही. प्रीतम किंवा पंकजा मुंडे अर्थातच आम्ही दोघींनी कोणत्याही पदाची कधीच अपेक्षा केली नाही मात्र आम्ही काम करतोय ते फक्त पक्षासाठी आहे. पक्षाच्या निर्णयाचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी ज्यांची निवड झाली आहे त्यांचे मी स्वागत करते आणि मोदींनी जो विश्वास दाखवला तो त्यांनी खरा करून दाखवावा असे देखील मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही मराठवाड्याचे भगीरथ व्हा, आम्ही सत्कार नाही दंडवत घालू – धनंजय मुंडे

News Desk

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बोलावली तातडीने बैठक

News Desk

शिवसेनेकडून राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचे योगदान !

News Desk