HW News Marathi
महाराष्ट्र

‘काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही’, काँग्रेस नेत्याची पवारांवर टीका

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरताच पक्ष आहे तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची होणारी घुसमट आणि सापत्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका पटवून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढविण्यास पक्षश्रेष्ठींकडून होकार आल्याचा दावा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला आहे. भानुदास माळी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस भवनात पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या सूचनेवरूनच मी राज्यभर ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करीत असून सोलापूर हा २१ वा जिल्हा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये आम्हाला गणले जात नसून राज्यभर कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याचा सूर मला या दौऱ्यात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवल्याचा पुनरूच्चार त्यांनी स्पष्टपणे केला.

ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. परंतू कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली मंत्रिपदं आणि मिळणारा निधी हा राष्ट्रवादी-शिवसेनेला मिळणाऱ्या निधीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. या सर्वांमुळे आगामी काळातील निवडणुकांत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली आहे.

आरक्षणमुक्त भारत करण्याचा डाव आरएसएसच्या माध्यमातून-

२००९ते २०१३ या काळामध्ये आमच्या सरकारने सामाजिक सर्वेक्षण करून इम्पीरियल डाटा तयार केला होता. तोच डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आरक्षणमुक्त भारत करण्याचा डाव आरएसएसच्या माध्यमातून भाजपने रचल्याचा गंभीर आरोपही भानुदास माळी यांनी यावेळी केला. दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न भेटल्यास त्यांना पक्षांतर्गत आरक्षण देऊन निवडणुकीत संधी दिली जाईल, असे देखील माळी यांनी स्पष्ट केल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर

Aprna

“मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस”, यशोमती ठाकूरांचा केंद्र सरकारवर घणाघात!

News Desk

रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार, उर्जामंत्र्यांची घोषणा

News Desk