HW News Marathi
महाराष्ट्र

“पंकजा तुम्ही जास्त बोलता…”, मोदींनी राष्ट्रीय सचिव बैठकीत घेतल्या कानपिचक्या

नवी दिल्ली | मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना जागा न मिळाल्याने कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. यानंतर आज (१३ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाजप नेत्यांचा चांगलाच क्लास घेतला आहे. मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांचीही मोदींनी कानउघडणी केली आहे.

”सध्या अनेकांना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. परंतु आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही,” असा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत लगावला. मंत्रीपद मिळालं नसल्यानं नाराज असलेल्या नेत्यांना मोदींनी चांगल्याच काचपिचक्या दिल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

प्रीतम मुंडे यांना केंद्रात स्थान मिळालं नसल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरू झालं. दरम्यान योगायोगानं भाजपच्या ११ राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली. यात मोदींनी या महत्त्वाकांक्षी नेत्यांना कानपिचक्या दिल्या. या बैठकीला अध्यक्ष जे पी नड्डा, बी एल संतोष, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर, सुनिल देवधर उपस्थित होते.

”संयम ठेवा अन्यथा राजकारण संपेल’

”राजकारणात संयम ठेवला नाही, तर कितीही मोठा नेता असला तरी त्याचं राजकारण संपुष्टात येतं,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित नेत्यांची कानउघाडणी केलीय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट रोख पंकजा मुंडे यांच्याकडेच असल्याची चर्चा बैठकीनंतर पदाधिकाऱ्यात सुरू झाली. राजकारणात संयम किती महत्त्वाचा आहे, हे उदाहरण देताना पंतप्रधान मोदींनी तीन नावांचा उल्लेख केला.

पहिले म्हणजे शंकरसिंग वाघेला, दुसरे मदनलाल खुराणा आणि तिसरे कल्याण सिंग. हे तिघेही राजकीय आखाड्यात कसलेले होते. दूरदृष्टी होती.. लोकनेते होते. परंतु फक्त संयम सुटला त्यामुळे तिघांचंही राजकारण संपल्याचं मोदी म्हणाले. मंत्रीपदाला नव्हे तर लोकसेवेला प्राधान्य द्या, असा कानमंत्रही मोदींनी दिला आहे.

पंकजा तुम्ही खूप बोलता..

एकूण ११ राष्ट्रीय सचिवांचा सोशल मीडिया रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातात घेऊन बसले होते. एकूण २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले होते. त्यावर कोणकोणते नेते ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामवर व्यक्त झाले आहेत. याची इत्यंभूत माहिती मोदींकडे होती. त्यामुळे सर्वांची भंबेरी उडाली.

पंकजा मुंडे यांचा नंबर आल्यावर, ”पंकजा तुम्ही जास्त बोलता.. ‘लोकल’ मुद्द्यावर पण खूप बोलता. पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकल पेक्षा राष्ट्रीय मुद्द्याकडे जास्त लक्ष द्या,” असा सल्ला मोदीजींनी दिला. परंतु, हे सांगताना मोदीजींनी.. तुम्ही खूप बोलता या शब्दावर जोर दिला. त्यामुळे सर्वांनाच त्याचा अर्थ कळाला.

बीड जिल्ह्यात एक मुस्लिम व्यक्तीनं गोशाळा बांधली

बीड जिल्ह्यात एक मुस्लिम व्यक्तीनं गोशाळा बांधलीय. तो दीडशे गायींचा सांभाळ करतो. त्यांना केंद्र सरकारनं पद्मश्री दिलाय. या पद्मश्रींना जाऊन तुम्ही भेटला आहात का, असा सवालही मोदींनी पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. त्यावर लोकांशी नाळ तोडू नका.. असा सल्लाही मोदींनी दिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे काल पुणे येथे आगमन  

Aprna

दूध पुरवठा सुरळीत राहणार | मुख्यमंत्री

News Desk

तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गला २५ कोटी जाहीर

News Desk