HW News Marathi
महाराष्ट्र

‘२०२४ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस नंबर एकचा पक्ष असेल’, नाना पटोलेंचं वक्तव्य!

मुंबई। महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. इतकंच नाही तर गेले काही दिवस ते अनेक वक्तव्यांसाठी चर्चेत आहेत. अशात पुन्हा एकदा पटोलंनी एक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र राज्यात  २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधात आहेत. हा संवाद साधताना नाना पटोले यांनी काही वक्तव्य केली आहेत यावरुन आज (१४जुलै) शिवसेनेने ‘सामना’तून नाना पटोलेंच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसच्या किती कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली असा सवाल उपस्थित केला आहे.

नाना पटोलेंनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी “महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे. तुम्हाला त्याचा निकाल भविष्यात पाहायला मिळणार. आम्ही जी दिशा घेऊन काम करतोय, त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल हे २०२४ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल,” असं वक्तव्य केले आहे. “स्वबळाचा निर्णय हा पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. शरद पवार यांनी काल( १३ जुलै) ला जे वक्तव्य केलं आहे तेच वक्तव्य म्हणजेच २०१४ मध्ये पण त्यांनी असाच निर्णय घेतला होता. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता. निवडणुका कशा लढायच्या ही आमच्या पक्षाची रनणीती आहे,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

फडणवीस सरकारच्या काळात अनेकांवर पाळत ठेवण्यात आली

“नाना पटोले  काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे. नानांवर पाळत ठेवली जात आहे, असे त्यांना वाटते. कालच्या विधिमंडळ अधिवेशनात नानांनी ‘पाळत’ ठेवण्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला. फडणवीस सरकारच्या काळात अनेकांवर पाळत ठेवण्यात आली. महत्त्वाच्या नेत्यांचे फोन ‘टॅप’ करण्यात आले. त्यात नानाही होते. आता या प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन ‘टॅप’ करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱ्या प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले,” असा घणाघात शिवसेनेने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंत गीते म्हणाले, पवार आमचे गुरू होऊ शकत नाही, तर तटकरे म्हणतात…!

News Desk

मी गद्दार नाही, शिवसेनेचा खरा गद्दार अनिल परब आहे!; रामदास कदमांचा सवाल

Aprna

“जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथे…” मोहन भागवत यांचं वक्तव्य!

News Desk