HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नाना पटोलेंचं पवारांकडे बोट?

मुंबई। काँग्रेससोबत २०१४ मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली होती. आणि काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवारांचं निमंत्रणच नव्हतं, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा दावा केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल (१३जुलै) शरद पवारांची भेट घेतली. मात्र या बैठकीला नाना पटोले नव्हते.

काँग्रेस नेत्यांच्या शरद पवारांच्या भेटीबद्दल आज (१४जुलै) नाना पटोलेंना पत्रकारांनी विचारलं. त्यावर पटोले म्हणाले, “अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचं निमंत्रण नव्हतं, की नानांना घेऊन या वगैरे, मला त्या भेटीची कल्पना देखील नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यावर मी विचारलं, त्यावर त्यांनी मला सांगितलं ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यामुळे माझा राग वगैरे काहीही नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जर माझ्या पक्षाचं काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही” २०१४ मध्ये काँग्रेसशी धोका झाला, २०२४ मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत, असं देखील नाना पटोलेंनी सांगितलं.

नानांकडे संजीवनी गुटिका, ते पक्षाला जागे करुन पुढे नेणार

नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला जागे करून पुढे नेणार आहेत. या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींना दिली आहे काय? देशातील अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन पडली आहे व त्या प्रत्येक राज्यात नानांना द्रोणागिरी पर्वत उचलून त्यातली संजीवनी गुटिका द्यावीच लागेल. लक्ष्मण मुर्छीत झाला तेव्हा हनुमानाने हेच केले होते, पण येथे नक्की कोण मुर्छीत झाले आहे व हनुमानाच्या भूमिकेत कोण आहे? ते पाहायला हवे.

शरद पवार काय म्हणाले होते?

महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिला. नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं शरद पवार यांनी म्हटलं. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही पवारांनी त्यांना अनुलेखाने टाळलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाभळी बंधारा कुणासाठी ? – महाराष्ट्रातील जनतेचा सरकारला सवाल

News Desk

‘प्रयास’च्या सायकल रॅली माध्यमातून वाहतूक नियम आणि आरोग्याविषयी जनजागृती

News Desk

सचिन वाझे पोलिस सेवेतून बडतर्फ !

News Desk