HW News Marathi
महाराष्ट्र

‘फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील’, पटोलेंचा गौप्यस्फोट

मुंबई। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झोटिंग समितीच्या अहवालावर प्रतिक्रिया करताना मोठं विधान केलं आहे. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. खडसेंचंही राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, असं सांगतानाच तत्कालीन फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली.

नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्यानंतर पुन्हा सापडला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. खडसेंचं राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असं सांगतानाच झोटिंग समितीचा अहवाल वाचला नाही. तो पुढे येईल तेव्हा त्यातील कळून येईल, असे देखील नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्राचा नेता राष्ट्रपती झाला तर आनंदच –

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला आनंद होईल. महाराष्ट्रातील नेता राष्ट्रपती होत असेल तर आनंदच होईल. पण राष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय पातळीवर काही प्रक्रिया सुरू झाली असेल तर मला त्याबाबत माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्रीपदाची मी कधीही मागणी केली नाही-

राज्याच्या मंत्रिमंडळातही फेरबदल करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबत काय सांगाल? त्यावेळी पटोले उत्तरले की, त्यावर सरकारमधील फेरबदलाची काहीच चर्चा नाही, हायकमांड त्यावर निर्णय घेतील. मात्र, फेरबदलाविषयी आघाडीत चर्चा नाही. त्यावर बोलता येणार नाही, असं सांगतानाच मंत्रीपदाची मी कधीही मागणी केली नाही. हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल. पक्षाने आदेश दिल्यावर मी विधानसभा अध्यक्षपद सोडलं. आताही हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य करू, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

पवारांचं निमंत्रणच नाही-

त्यावर नाना म्हणाले, “अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचं निमंत्रण नव्हतं, की नानांना घेऊन या वगैरे, मला त्या भेटीची माहितीही नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यावर मी विचारलं, त्यावर त्यांनी मला सांगितलं ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यामुळे माझा राग वगैरे काहीही नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जर माझ्या पक्षाचं काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FIR सार्वजनिक करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार? चित्रा वाघ यांचा परखड सवाल

News Desk

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार येणार आणि ५ वर्ष चालणार!

News Desk

माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करु नका; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर परखड टीका

News Desk