HW News Marathi
महाराष्ट्र

‘दिल्लीला जाण्यापूर्वी शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक,’ महत्त्वाच्या तीन विषयांवर चर्चा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज (15 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण यापैकी तीन मुख्य विषयांवर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धा तास बैठक झाली. शरद पवार उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे ते पुढचा आठवडाभर दिल्लीतच राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे.

१९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीची काय भूमिका आणि मुद्दे असावेत यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर कृषी विषयक प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर संसदेत काय भूमिका मांडावी, या विषयावरही चर्चा झाल्याच सांगण्यात येत आहे.

पवार उद्या दिल्लीत जाणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूीमीवर ते दिल्लीत जाणार असून ते आठवड्याभर तिथे राहणार असल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विषय चर्चेसाठी आहेत. केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचं नवं खातं निर्माण केलं आहे. या खात्याचे सर्व सूत्र अमित शाह यांच्याकडे देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलं वर्चस्व आहे. सहकार क्षेत्राशी अनेक मुद्दे संबंधित आहेत. पुढच्या काळात केंद्र सरकारचा राज्यांच्या सहकार क्षेत्रावर हस्तक्षेप होऊ शकतो, अशी धास्ती आहे. त्यामुळे या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

पटोलेंचा आक्रमक पणा-

काँग्रेसने आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली आहेच पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसने यापूर्वी अशी आक्रमक भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सरकारचे चालक आहेत आणि काँग्रेस त्यांचा एक भाग आहे, असं चित्र होतं. पण काँग्रेसची भूमिका अचानक आक्रमक झाली आहे.

भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नात-

भाजपने अत्यंत आक्रमकपणे हे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना जेरीस आणायचं. दोन्ही पक्षांपैकी एका पक्षाला आपल्यासोबत यायला भाग पाडायचं, असा प्रयत्न भाजपने सुरु ठेवला आहे. या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरविंद सावंत यांच्या नावे बोगस सोशल मीडिया अकाऊंट, पैशांची केली मागणी

News Desk

‘शिक्षकांचा मार पडला अन् भाषणं द्यायला लागलो’, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

News Desk

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज !

Gauri Tilekar