HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी -शिवसेना -भाजप नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता ? संजय राऊत!

नवी दिल्ली। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण आता तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांनी जोरही धरला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता खुलासा देखील केला आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. त्याविषयी मी त्यांच्याशी संवाद साधला. पण तुम्हाला वाटतं तसे राजकारण यात नाही, असं राऊत म्हणाले.

अमोल कोल्हेनां प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांच्या आशीर्वादाने सरकार चालू असल्याचं विधान केलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे वयाने, अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ते मान्य केलं आहे. अमोल कोल्हे राणा भीमदेवी थाटात बोलले असतील. पण हे तीन पक्षांचे सरकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मनसे, भाजप एकत्र येण्याची चिन्हे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिकमध्ये भेटले. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अशी समीकरणे राजकारणात होत असतात. पण महापालिकेवरील शिवसेनेचा झेंडा खाली उतरणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यकर्त्यांशी मतभेद असू शकतात

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तर उत्तर प्रदेश सोडून जाऊ, असा इशारा दिला आहे. त्यावरही राऊत म्हणाले, या देशात राज्यकर्त्यांशी मतभेद असू शकतात. राज्यकर्त्यांशी मतभेद असले तरी देशात कुणाला असुरक्षित वाटू नये.

ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानांसमोर उपस्थित करू

उद्या सोमवारी (१९जुलै) लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक झाली. देशातील महागाई, कोव्हिड, पेट्रोल दरवाढ, लडाखमध्ये चीनची घुसखोरी आदी विषयांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष करणार आहे. या बैठकीत ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानांसमोर उपस्थित करून त्यांना ठोस निर्णय घ्यायला सांगू, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

Aprna

“पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात”, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य

News Desk

शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

News Desk