HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकार सध्या इंधनावरील करात कपात करण्याच्या मानसिकतेत नाही…!

नवी दिल्ली। देशातील इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनता आणि विरोधकांच्या टीकेची धनी ठरली आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, मोदी सरकारचा सध्याचा एकूण कल जर पाहिला तर जनतेला आणखी काही दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सहन करावी लागू शकते.

मोदी सरकार यासाठी फार अनुकूल नाही

केल्यास पेट्रोल-डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होईल. मात्र, त्यामुळे महागाई दरात जास्तीत जास्त 0.2 टक्क्यांचीच घट होईल. याउलट सरकारच्या तिजोरीतील महसूल 0.58 टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळे इंधनाच्या करकपातीचा विशेष फायदा होणार नाही. परिणामी मोदी सरकार यासाठी फार अनुकूल नाही. तसेच इंधनावरील करकपातीमुळे महसूल कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात ही गोष्ट केंद्र सरकारसाठी चांगली नाही. त्यामुळे इंधनाच्या दरातील कपात आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढता आलेख असलेले इंधनाचे दर आता स्थिरावले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील इंधनाच्या दराने वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल 11 रुपयांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे इतर गोष्टींच्या किंमतीवरही परिणाम पाहायला मिळत आहे.

सीएनजीचा दर किती?

त्यामुळे आता मुंबई व आसपासच्या परिसरात सीएनजी 51 रुपये 98 पैसे प्रति किलो तर पीएनजी स्लॅब 1 मध्ये 30.40 रुपये व स्लॅब 2 मध्ये 36 रुपये या दराने उपलब्ध होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या वाढत्या किंमतींमागे प्रवास खर्च आणि दुसऱ्या खर्चांचा देखील समावेश आहे.

सीएनजीचे दर वाढले, ग्राहकांमध्ये संताप

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. असेच जर दर वाढत राहिले तर आम्ही गाड्या चालवायच्या की नाही, कामाला जायचं की नाही, असे उद्विग्न सवाल ग्राहक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात

News Desk

रेल्वेने ३९२ ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा घेतला निर्णय

News Desk

३ दिवसांत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढा नाहीतर…बच्चू कडूंचा केंद्राला इशारा

News Desk