HW News Marathi
महाराष्ट्र

‘ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही’, उद्धव ठाकरेंचं विधान

मुंबई | कोकणात ढगफुटीमुळे पावसाने थैमान घातलं आहे. रायगडच्या तळीये गावात आज(२३ जुलै) दरड कोसळून ३६ लोकांचा जीव गेला आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं वक्तव्य स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली

महाडच्या तळीये गावात दरड घरांवर कोसळून ३६ लोकांचा आता पर्यंत जीव गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत या विषयी स्पष्ट केलं आहे. तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली होती. त्यावेळी अनेक लोकांना वाचवण्यातही आले. मात्र, आतापर्यंतच्या माहितीनुसार या दुर्घटनेत ३६ लोक मृत्यूमुखी पडल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले,’ गेल्या तीन ते चार दिवसांपासून मी राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही काल मला दूरध्वनी आला होता’. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या (NDRF) तुकड्या राज्यात पोहोचल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ढगफुटीचा नेमका अंदाज कोणालाही वर्तवता येत नाही

कोकणात ढगफुटी झाल्यामुळे अतिवृष्टी झाली आणि नद्यांना पूर आला. पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरून खूप नुकसान झालं आहे. ‘ढगफुटीचा नेमका अंदाज कोणालाही वर्तवता येत नाही. त्यामुळे ढगफुटी नेमक्या कोणत्या भागात होईल, हे माहिती नसते. कोकणात अनेक भागांमध्ये पूरामुळे रस्ते खचले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनाही त्याठिकाणी पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. या सगळ्यातून मार्ग काढत पथके त्याठिकाणी पोहोचत असल्याचे’ उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

कशी घडली ही दुर्घटना?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी!

News Desk

महापौर पेंग्वीन पाहाण्यासाठी गुजरातला गेल्या, पण…; चित्र वाघांचा टोला

Aprna

आता भाजपमध्ये आणखी अनेक नेत्यांचा प्रवेश होणार ! फडणवीसांचा गौप्यस्फोट

News Desk