HW News Marathi
महाराष्ट्र

“आता कुठे त्यांना घरातून डिस्चार्ज मिळाला आहे”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका..!

महाड। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळीये दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टोला लगावला आहे. आता कुठे त्यांना घरातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता फिरत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर नाव न घेता केली आहे.

उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल राणेंना यावेळी करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे

आरोप करणं योग्य नाही

कोकणात वारंवार पूरस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. डोंगराची माती खाली येईल किंवा डोंगराचा कडा कोसळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे या घटनेवरून कुणावर आरोप करणं योग्य नाही. आज या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले.

पक्की घरं बांधून दिली जाईल

तळीये दुर्घटनेत 87 लोक गेल्याचं कळतं. 44 मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं राणे म्हणाले.

केंद्राकडूनही स्थानिकांना मदत

गावकऱ्यांच्या इच्छेनुसार पुनर्वसन

या गावातच आपलं पुनर्वसन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरती वसाहत तयार करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोक सांगतील तिथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्व घटनेची माहिती दिली जाईल. नुकसानीचं स्वरुप सांगितलं जाईल. त्यांनीही मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे, असं त्यांनी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडेट्टीवार यांच्या विरोधात लढलेले शिवसेना उमेदवार काँग्रेसमध्ये दाखल

News Desk

ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारची त्रिसदस्यीय समिती

Gauri Tilekar

राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा संभाजीराजेंचा आदेश

News Desk